शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ सांस्कृतिक चैन ठरेल

By admin | Updated: January 11, 2015 00:57 IST

मराठी भाषा सल्लागार समितीने केलेल्या अनेक शिफारशींमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी सांस्कृतिक चैन ठरेल.

पुणे : मराठी भाषा सल्लागार समितीने केलेल्या अनेक शिफारशींमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी सांस्कृतिक चैन ठरेल. त्यापेक्षा मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था समन्वयाने कार्यरत होण्याची गरज असून, त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस शिक्षणतज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी केला. ‘पाखरांची शाळा’, मूलांच्या मूल्यकथा’, ‘मोहनदास करमचंद’ यांसारख्या शिक्षण, बालसाहित्य आणि वैचारिक आदी विविध विषयांवरील पुस्तकांच्या माध्यमातून मराठी साहित्यासह शैक्षणिक क्षेत्रातही अमूल्य योगदान दिलेले डॉ. न. म. जोशी हे रविवारी ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचाही हाच जन्मदिन आहे. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबत ‘लोकमत’ने डॉ. जोशी यांच्याशी संवाद साधला. मराठी भाषेचे संवर्धन, इंग्रजीच्या वर्चस्वामुळे बंद पडत असलेल्या मराठी शाळा, भाषा धोरण आदी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस आदर्श म्हणून ठीक आहे. पण, महाराष्ट्रामध्ये जी काही विद्यापीठे आहेत, त्यामध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्यांचे कार्य कोणत्या प्रमाणात कमी पडते? तरीही स्वतंत्र विद्यापीठ करायचे झाल्यास त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविला गेला पाहिजे, अन्यथा हे विद्यापीठ म्हणजे सांस्कृतिक चैन ठरेल. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘ मराठी भाषा सल्लागार समितीने भाषेचे पुढील पंचवीस वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी शासनाला सादर केलेल्या मसुद्यामध्ये ज्या अनेक शिफारशी केल्या आहेत, त्या तात्त्विकदृष्ट्या चांगल्या आहेत. मात्र, मराठी भाषेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जो ठोस कृती कार्यक्रम आवश्यक आहे, त्याचा विचार खूप कमी प्रमाणात करण्यात आला आहे. कोणतीही भाषा ही कुटुंबात समाजात अनौपचारिकपणे आणि शिक्षणक्रमात औपचारिकपणे शिकविली जाते. भाषा संवर्धनात अध्ययन, अध्यापन प्रक्रियेचा मोठा संबंध असतो. याबद्दलचा विचार या शिफारशीमध्ये होणे अपेक्षित होते. स्वतंत्र विद्यापीठ असावे, हे आदर्शवत वाटत असले, तरी आज पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी विद्यापीठे असून, त्यामध्ये स्वतंत्र मराठी विभाग आहेत. मात्र, त्यांचे कार्य कोणत्या प्रमाणात कमी पडते म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे, याचा उलगडा झालेला नाही. (प्रतिनिधी)४भाषेशी संबंधित काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ आदी विविध स्वतंत्र संस्था आहेत. त्यांच्या समन्वयाने सक्षमपणे कार्य करण्यावर भर दिला गेला पाहिजे. म्हणूनच भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या शिफारशीचा पुनर्विचार व्हायला हवा. बालवाडीपासून ते मराठी भाषेच्या संशोधकांपर्यंत सर्वांसाठी कृतिशील कार्यक्रम आखला जावा. मराठी भाषेसाठी चांगले विकास कार्य करण्यास आपण कमी पडत आहोत म्हणूनच मराठी शाळा बंद पडत आहेत का? याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा, याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले.