शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन : आढळराव

By admin | Updated: February 20, 2017 01:57 IST

खासदारांमुळे विमानतळ खेडबाहेर गेले हा आरोप सिद्ध करा, मी राजकारण सोडेन. सिद्ध करता आले नाही

मंचर : ‘‘आंबेगावचे लोकप्रतिनिधी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. खासदारांमुळे विमानतळ खेडबाहेर गेले हा आरोप सिद्ध करा, मी राजकारण सोडेन. सिद्ध करता आले नाही आले तर तुम्ही राजीनामा द्या,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा समारोप मंचर येथे झाला. त्या वेळी झालेल्या सभेत आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, वळसे पाटील ६ वेळा आमदार झाले. त्यांनी २७ वर्षांत काय केले याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे. मी ३ वेळा लोकसभेला निवडून आलो आहे. त्यामुळे जनतेने निवडून दिल्याने कामाचा हिशेब मी जनतेला सांगण्यास बांधिल आहे.माझ्या सोबत होते त्या वेळी सुधारणा झाली होती, आता कोण कोण बरोबर असते ते काय माहीत, असा टोला त्यांनी लगावला.बैलगाडा शर्यतीसंदर्भात मार्चच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. वळसे पाटील म्हणतात विधानसभेत खासगी विधेयक आणणार. मग २७ वर्षे काय करत होत? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यावर टीका करताना आढळराव पाटील म्हणाले, माझी काय चूक झाली, माझ्यावर अन्याय झाला, असा अपप्रचार बाणखेले करतात. पक्षाच्या विरोधी लढायचे व मी निष्ठावंत म्हणायचे हे चालणार नाही. बऱ्याच लोकांचा विरोध असूनसुद्धा तुम्हाला पक्षात घेतले ही आमची चूक झाली. गद्दारांना परत शिवसेनेत प्रवेश नाही, असे आढळराव यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)