शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढतोय; म्हणूनच दरड कोसळण्याच्या घटनेतही वाढ - माधव गाडगीळ

By श्रीकिशन काळे | Updated: July 20, 2023 20:25 IST

देशभरात दरड कोसळण्याच्या घटनांत शंभरपटीने वाढ, सरकार करतंय काय? गाडगीळ यांचा सवाल

पुणे :‘‘देशात विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि नागरिकांच्या अधिकारांना बाजूला ठेवले जात आहे. पश्चिम घाटाचा अभ्यास करून मी २०११ मध्येच केंद्र सरकारला अहवाल दिला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज शंभर पट्टीने दरड कोसळण्याच्या घटना होत आहेत. हे केवळ आपल्याकडेच नव्हे, तर देशभरात होत आहे, सरकार करतेय काय?’’ असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगड येथे बुधवारी रात्री दरड कोसळून त्याखाली इर्शाळवाडी गाव दबले गेले. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉ. गाडगीळ यांनी सादर केलेला पश्चिम घाटावरील अहवालाचा मुद्दा समोर आला आहे. डॉ. गाडगीळ यांनी अभ्यास करून २०११ मध्ये केंद्र सरकारकडे हा अहवाल दिला. केंद्र सरकारनेच समिती स्थापन करून डॉ. गाडगीळ यांना अहवाल करायला सांगितले होते. परंतु, तो अहवाल स्वीकारण्यात आला नाही. त्यामध्ये पश्चिम घाटातील भाग संरक्षित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. हा अहवाल विकासविरोधी असल्याची टीका केल्याने तो बासनात गेला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम घाटात रस्ते करणे, खोदकाम करणे, खाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. परिणामी भुस्खलन होत आहे. या सर्व प्रकारावर डॉ. गाडगीळ यांनी खंत व्यक्त केली.

...म्हणून हाेतेय भूस्खलन 

इर्शाळगड सारख्या घटना देशभरात होत आहेत. पश्चिम घाटात गेल्या दहा वर्षांमध्ये दरडींचे प्रमाण शंभर पट वाढले आहे. मी २०११ मध्ये अहवाल केंद्राकडे पाठविला होता. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये दरडी कोसळण्यात आणखी भर पडत आहे. सध्या जोरदार पाऊस पडत आहे. निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढत आहे. पश्चिम घाटात तर दगडखाणी आणि रस्ते तयार करण्यासाठी खूप हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे भूस्खलन होत आहे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले.

पश्चिम घाटात अतिसंवेदनशील असलेला भाग ३० टक्के 

आम्ही अहवालात दिले आहे की, पश्चिम घाटातील काही भाग विशेष संवेदनशील आहे. तीन पद्धतीचे संवेदनशीलता आहे. अति संवेदशनील, दुसरी मध्यम संवेदनशील आणि तिसरी कमी संवेदनशील. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ वनस्पती, वन्यजीव आहेत. निसर्गातील हस्तक्षेप थांबविणे आवश्यक आहे. पश्चिम घाटात अतिसंवेदनशील असलेला भाग ३० टक्के आहे. तो सर्व संरक्षित करायला हवा. पश्चिम घाटातील दगडखाणी तातडीने थांबवायला पाहिजेत. मानवाचे आणि निसर्गाचे अधिकार शाबूत ठेवून कामे व्हावीत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा विकास व्हावा. - डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसRaigadरायगडenvironmentपर्यावरणNatureनिसर्गSocialसामाजिक