शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे? - सुरेश द्वादशीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 1:16 AM

काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे.

पुणे - काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. पंडित नेहरूंना आपल्या लष्कराच्या स्थितीची जाणीव होती. हे प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत याची देखील त्यांना पूर्णपणे कल्पना होती म्हणूनच त्यांनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला, तो एक धोरणाचा भाग होता. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असली तरी काश्मीर प्रश्नाबाबत नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.देशाचे नेतृत्व करणारे मग ते नेहरू किंवा नरेंद्र मोदी असोत, देशाचे दुबळेपण सांगू शकत नाहीत. ‘आम्ही तयार आहोत’ असेच सांगावे लागते, त्यामागचे लष्कराचे वास्तव जाणून घ्यायला हवे असेही ते म्हणाले. साधना साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकीर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजावादाची बीजे रोवू पाहात होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहात आहेत अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. मात्र नेहरूंना गरीब-श्रीमंत ही विषमता दूर करणारा समाजवाद रुजवायचा होता. दरम्यान सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका मांडली होती. मात्र ही भूमिका पंडितजींना मान्य नव्हती. सरतेशेवटी पटेलांनाच काही काळानंतर संघावर बंदी घालावी लागली.देशाला कम्युनिस्टांपासून नव्हेतर धर्मांधांपासून धोका आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला, कठोर निर्णयही घ्यावे लागले. गांधीजींचा वध ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटूता नव्हती. त्यांना जोडणारा पूल हे गांधीजी होते. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. अणुऊर्जा केंद्र, शैक्षणिक संस्था, क्षेपणास्त्र अशा अनेक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर