शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

Heatstroke Death: राज्यात उष्माघाताचे ५५ रुग्ण; मृत्यूच्या २ घटनांबाबत साशंकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:11 IST

Maharashtra Heatstroke Deaths: आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुणे : राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. एकूण ५५ उष्माघातग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ३८ रुग्ण एक मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत आढळले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १७ रुग्ण नोंदविण्यात आले होते. याच कालावधीत दोन मृत्यूंची नोंद झाली असली, तरी त्या मृत्यूंचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आरोग्य विभागाने त्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग, बालरोग आणि आपत्कालीन विभागांत मिळून एकूण ३ लाख ८२ हजार ७२५ रुग्णांनी विविध आजारांसाठी उपचार घेतले. यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्र, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये ६, गडचिरोली व रत्नागिरी येथे प्रत्येकी ४, तर अहिल्यानगरमध्ये ३ रुग्णांची नोंद झाली आहे. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे येथे प्रत्येकी २, तर अकोला, अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्यात आले असून, ग्रामीण रुग्णालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक औषधे आणि द्रवपदार्थांचीही व्यवस्था केली आहे.

उष्माघाताची सुरुवात सौम्य लक्षणांपासून होत असली तरी वेळेवर उपचार न मिळाल्यास ती गंभीर ठरू शकते. शरीराचे तापमान वाढणे, डोकेदुखी, चक्कर, अशक्तपणा, मळमळ, त्वचा कोरडी व गरम होणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि काही वेळा बेशुद्धावस्था ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

अत्याधिक उष्णतेत दीर्घकाळ राहणे, शरीरातील पाण्याची कमतरता आणि दुपारच्या कडाक्याच्या उन्हात काम करणे ही उष्माघाताची प्रमुख कारणे मानली जातात. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, तसेच डोक्याचे संरक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Heatstroke Alert: 55 Cases, Doubts Over Two Deaths

Web Summary : Maharashtra reports 55 heatstroke cases, mostly since March. Two deaths are under investigation. Hospitals are equipped with special wards and resources. Citizens are urged to avoid midday sun and stay hydrated to prevent heatstroke.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHeat Strokeउष्माघातHeatwaveउष्णतेची लाटDeathमृत्यू