शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

यंदा निम्म्याने टँकर घटले!

By admin | Updated: July 18, 2015 04:18 IST

जलयुक्त शिवार योजनेमधून झालेली कामे, जानेवारीपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी यांमुळे यंदा जिल्ह्यात

पुणे : जलयुक्त शिवार योजनेमधून झालेली कामे, जानेवारीपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी यांमुळे यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ कमी बसली. या वर्षी टंचाई काळात ४८ टँकर सुरू होते. गेल्या वर्षी टँकरची संख्या ९०च्या घरात गेली होती. आज (दि. १७ जून) जिल्ह्यात १८ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी ८८ टँकर सुरू होते.जलयुक्तमधून झालेल्या कामांचा आतापासूनच परिणाम दिसू लागला आहे. जून महिन्यात २२७.९३ मिलिमीटर इतका जिल्ह्यात पाऊस झाला. दर वर्षी तो १४२ मिलिमीटर इतका असतो. ज्या तालुक्यांत जूनचा हा पाऊस झाला, तेथे जलयुक्तमधून झालेल्या कामांमुळे जुलै महिन्यातील पाणीटंचाईची झळ कमी झाल्याचे दिसून आले. विहिरींचे उद्भव वाढल्याने पाण्यासाठीची भटकंती कमी झाली. तसेच, जानेवारीपासून जिल्ह्यात दर महिन्याला अवकाळी पाऊस पडत होता. तसेच जिल्ह्यात झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेल्या तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या व टंचाईग्रस्त २०० गावांची निवड करून सुमारे २१९ कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यांपैकी शासन निधी ३६ कोटी व लोकसहभागातून २२ कोटी, अशी ५८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. ३१ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात १४० गावे, तर राहिलेली ६० गावे ३१ डिसेंबर २०१५ व ३१ मार्च २०१६ पर्र्यंत दोन टप्प्यांत टंचाईमुक्त होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.