शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

गुरूनाथ नाईक यांना पहिली रहस्यकथा पुण्यातच सुचली, जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 19:47 IST

गूढ शैली आणि रंजकता या वैशिष्टांमुळे त्यांच्या कादंब-यांनी मराठी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवले

पुणे : आपल्या रहस्यकथांनी अवघ्या महाराष्ट्राला झपाटून टाकणारे आणि तब्बल बाराशे कादंब-या लिहून रहस्यकथेच्या प्रांतात अढळ स्थान निर्माण करणारे "रहस्यकथा"कार गुरूनाथ विष्णू नाईक (वय 84) यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. 

गुरूनाथ नाईक यांना पहिली रहस्यकथा ही पुण्यातच सुचली. १९७० साली कामानिमित्त पुण्यात आले असताना एका प्रकाशकाने त्यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार दिला. यादरम्यान ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स अँन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवरगेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी  ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा लिहून काढली.

त्यानंतर ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी कथा त्यांनी लिहिली. प्रकाशकाकडून त्यांच्या कथा लेखनाला हिरवा कंदिल मिळाला आणि गुरुनाथ नाईक यांचा रहस्य कथाप्रांतात उदय झाला. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंब-या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. त्यांच्या कादंब-यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. पुणे आकाशवाणी केंद्रासाठी त्यांनी काही सांगीतिका आणि श्रृतिकाही लिहिल्या.

गूढ शैली आणि रंजकता या वैशिष्टांमुळे त्यांच्या कादंब-यांनी मराठी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवले. आपल्या घराण्याचे ’नाईक’ हे मूळ आडनाव वापरून तसेच ‘हेमचंद्र साखळकर’ हे नाव परिधान करून त्यांनी विपुल लेखन केले. ’कॅप्टन दीपच्या ’’शिलेदार’ कथा, मेजर अविनाश भोसलेच्या ‘गरुड’ कथा, उदयसिंह राठोडच्या, ‘गोलंदाज’कथा, सूरजच्या  ‘शब्दवेधी’ कथा, रजनी काटकरच्या   ‘रातराणी’ कथा, जीवन सावरकरच्या   ‘सागर’ कथा आणि बहिर्जी नाईकच्या ‘बहिर्जी’ कथा, अशा एकाहून एक सरस पात्रांच्या सुरस आणि मनोवेधक रहस्यकथा लिहून त्यांनी साहित्य विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. बाबूराव अर्नाळकरांच्या कादंब-यांचाही विक्रम नाईक यांनी मोडला.

नाईक यांची  ‘अजिंक्य योद्धा’, ’अंधा कानून’, ’अंधाराचा बळी’, ’अफलातून’, ’आसुरी,  ‘कायदा’,  ‘कैदी नं. १००’, ’गरुडभरारी’, ’गोलंदाज’, ’झुंज एक वा-याशी’,  ‘तिसरा डोळा’, ’दिल्लीचा ठग’, ’देहान्त’, ’रणकंदन’, ‘रणझुंज’,  ‘सरळ चालणारा खेकडा’, ’सवाई’, सुरक्षा’,  ‘हर हर महादेव’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत. ’स्वर्ग आणि नर्क’ ही त्यांची शेवटची कादंबरी ठरली.

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाSocialसामाजिक