शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंंचायत निवडणुकीचे पडघम

By admin | Updated: July 4, 2017 03:18 IST

गतवर्षीच्या दिवाळीदरम्यान सुरू होणारा निवडणुकांचा हंगाम यंदा वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
डोर्लेवाडी : गतवर्षीच्या दिवाळीदरम्यान सुरू होणारा निवडणुकांचा हंगाम यंदा वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर आता जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागलेत. वर्षअखेरीस जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती निवडणुकीतही विधान परिषदेपासून निवडणुकीचा मोसम सुरू झाला. चार महिने हा मोसम होता. त्यानंतर सहा महिन्यांची वेळ आहे; मात्र आतापासूनच ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरू झाली.
ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत. मात्र, येथे कोणत्या गटाची किंवा पक्षाच्या नेत्यांची सत्ता आहे, हे सहजपणे ओळखता येते. तसेच आता या वर्षी जरा वेगळ्या प्रमाणे निवडणूक आयोगाने आरक्षण केले आहे. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ग्लोबल इन्फॉर्मेशन मॅप (जीआयएस) आणि गुगल अर्थच्या नकाशांवरून प्रभागरचना केली गेली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या नकाशांचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेकडून प्रभागरचना आणि आरक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) आणि गुगल अर्थच्या नकाशांची समांतरजुळणी (सुपर इम्पोज) करून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभागरचना केली आहे. गुगल नकाशांनुसार तहसीलदारांनी एमआरएसएसी नकाशांची समांतर जुळणी केली आहे. हे करताना नकाशांमध्ये रस्ते, नदी, ठळकपणे दर्शविण्यात आले.

२०११ च्या जनगणनेनुसार होणार रचना

1 ग्रामपंचयात क्षेत्रातील वाडी, वस्ती, पाडे वगळणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभागरचना करताना ग्रामपंचायतींची २०११मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या भागिले ग्रामपंचायतींची एकूण सदस्यसंख्या, या सूत्रानुसार प्रभागांची लोकसंख्या निश्चित करू, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

2यंदा प्रथमच जीआयएस आणि गुगल अर्थच्या नकाशांवर आधारित प्रभागरचना केली. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तलाठी कार्यालय स्तर नकाशांवर प्रभागरचना केली जात होती. त्यामुळे प्रभागरचनेत लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार अचूकता येत नव्हती. प्रभागरचनेवर अनेक आक्षेप नोंदविले जात होते.

गुगल अर्थ व जीआयएस नकाशांद्वारे प्रभागरचना केल्याने अचूकता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागरचनेनंतर जातीनिहाय आरक्षणदेखील जाहीर केले आहे.

ग्लोबल इन्फॉर्मेशन मॅप (जीआयएस)च्याच साह्याने डोर्लेवाडीमध्येही मॅपिंग केले गेले व प्रभागरचनेनंतर जातीनिहाय आरक्षण सोडत काढली गेली.