शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

चार वर्षांपासून कऱ्हेचे बंधारे कोरडे  : पावसाने फिरवली पाठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 2:32 PM

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही.

ठळक मुद्देनाझरे व पुरंदर उपसाचेही पाणी सोडण्याची मागणी

काऱ्हाटी  : कऱ्हा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे चार वर्षांपासून कोरडे ठणठणीत आहेत. नाझरे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरंदर उपसाचे पाणी सोडून बंधारे तातडीने भरण्याची मागणी नदीकाठच्या गावातून केली आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागासाठी शासनाने आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी हायस्कूल, जगतापवस्ती, जळगाव कडेपठार, लोणकरवस्ती, कदम वस्ती,कऱ्हा वागज, बऱ्हाणपूर, अशा अनेक भागांत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून या भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीला त्याचा फायदा झाला. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भागवण्यास मदत झाली. मात्र, सलग चार वर्षांपासून या भागात अत्यल्प पडणारा पाऊस व या बंधाऱ्यात पावसाव्यतिरिक्त कुठलेही पाणी येत नसल्यामुळे हे बंधारे कायमच कोरडे ठणठणीत आहेत.बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही. मात्र, या भागाच्या दक्षिण व  उत्तर दिशेला  वाहणारी नीरा व भीमा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या भागातून जाणारी कऱ्हा नदी मात्र कोरडी ठणठणीत आहे. अशाच वेळी पुरंदर उपसा व जानाई शिरसाई उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून बंधारे  भरण्याची  गरज आहे. मात्र या भागाचं वास्तव्य  शासन दरबारी कोणी मांडत आहेत, की  नाही, या भागाचे लोकप्रतिनिधी  नक्की काय करत आहेत, असा परखड सवाल काºहाटी येथील शेतकरी शिवाजी वाबळे यांनी बोलताना व्यक्त केले. 

सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.  अशा वेळी पुरंदर उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरावेत अन्यथा रिमझिम पावसाच्या जोरावर केलेल्या शेतातील पिकांचे  पाण्यावाचून मोठे नुकसान होणार आहे. पिके वाचविण्यासाठी नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींकडून पाटबंधारे खात्याला तोंडी मागणी केली मात्र त्याचा उपयोग होत नसल्याने आता लेखी पत्र देऊन  मागणी करणार आहे.- बी. के. जाधव, सरपंच

टॅग्स :BaramatiबारामतीriverनदीRainपाऊस