शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार ६०५ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा महाआयटीकडून चार खाजगी कंपन्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ‘महापोर्टल’ रद्द करून जिल्हा दुय्यम परीक्षा मंडळाकडून प्रकिया राबवण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ‘महापोर्टल’ रद्द करून जिल्हा दुय्यम परीक्षा मंडळाकडून प्रकिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार ‘महाआयटी’नी निविदा प्रक्रिया राबवून ओएमआर व्हेंडर म्हणून चार कंपन्यांची निवड केली. सामान्य प्रशासन विभागाने (माहीती तंत्रज्ञान) हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दोन वर्षांपासून रखलेल्या २७ हजार ६०५ पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र राज्य शासनाने काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची निवड केली असल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या शासकीय कार्यालयातील गट-ब, (अराजपत्रित) व गट-क पदे सरळ सेवेने भरण्यासाठी, महापोर्टल अंतर्गत परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला (महाआयटी) ‘सर्विस प्रोव्हायडर’ निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी चार कंपन्या निवडल्या आहेत.

‘महाआयटी’ने निवडलेल्या चारपैकी दोन कंपन्या काळ्या यादीतल्या आहेत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. निवड प्रक्रियेला तब्बल सहावेळा मुदत वाढ देण्यात आली. या दरम्यानच निवडलेल्या कंपन्या काळ्या यादीतून बाहेर काढल्याचे स्पष्ट झाले. यावरून काळ्या यादीतीलच कंपन्यांचीच निवड करण्यासाठी ‘महाआयटी’ने मुदत वाढ दिली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला तरी ‘महाआयटी’ने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

१३-१४ लाख अर्ज

“सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरतीच्या प्रतिक्षेत हे विद्यार्थी आहेत. किमान आता तरी कोणत्याही यंत्रणेने किंवा सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये,” अशी प्रतिक्रीया एका विद्यार्थ्याने दिली. जिल्हा दुय्यम परीक्षा मंडळाकडून भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने मंडळाऐवजी ‘महापोर्टल’ आणले. ‘महापोर्टल’मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून उद्धव ठाकरे सरकारने पुन्हा मंडळाच्या माध्यमातून ‘महाआयटी’ आणले. या नव्या भरती प्रक्रियेतली विश्साहर्ता तरी किती टिकेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे.

चौकट

अनुत्तरीत प्रश्न

-या परीक्षा पध्दतीत पारदर्शकता पाळली जाईल का?

-‘एमपीएससी’ची तयारी असताना ‘महाआयटी’ला परवानगी का?

- काळ्या यादीतील कंपन्यांची निवड कोणी आणि कशी केली?

- ‘महापोर्टल’च्या धर्तीवर ‘महाआयटी’त भ्रष्टाचार झाल्यास जबाबदार कोण? मंत्री की प्रशासन?