शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीत पाण्याअभावी मासे मृत्यूमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:09 PM

इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीवदान द्यावे,अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देऊन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी आटले आहे.लाखो जलचर प्राणी चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे .

इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.उजनी धरणाच्या दक्षिणेला नीरा नृसिंहपूरकडे जाणा-या भीमा नदीच्या काठावरील  बाभूळगाव,भाटनिमगाव,बेडशिंगे,अवसरी,सुरवड,वडापूरी, आदीं गावे वसलेली आहे. गावे वसलेली आहेत. या गावांच्या परिसरात हजारो एकर शेतजमिनी आहेत. ऊस,हळद,डाळिंब,ऊन्हाळी पिके घेतली जातात. लाखो रुपये खर्चून जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत.    ऊन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी आटले आहे.लाखो जलचर प्राणी चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. तसेच अनेक जलचर प्राणी चिखलात जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना पकडण्यासाठी अबालवृध्दांची कोरड्या पात्रातील चिखलात धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. जलचरांच्या या भयाण समस्येबरोबरच या भागातील पिकेसुध्दा वाळून चालल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे,अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे .

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरDamधरणFarmerशेतकरी