शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भोरमध्ये दमदार पाऊस; भातलावण सुरू

By admin | Updated: July 4, 2017 03:25 IST

चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील भुतोंडे व गुंजवणी खोऱ्यात भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत, तर पूर्व भागातील खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून, यापूर्वी पेरलेल्या बियाण्यांची पावसाने चांगली उगवण होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
तालुक्यात भाताचे एकूण क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून ७०० हेक्टरवर रोपवाटिकांची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी १०० हेक्टर असून, पेरणी ७० हेक्टरवर आहे. (७० %), नाचणी १५०० हेक्टर क्षेत्र असून, रोपवाटिका १३०० हेक्टरवर झाली आहे (८०%). कडधान्य तूर, मूग, उडीद १००० हेक्टर असून, पेरण्या ६०० हेक्टरवर (६०%) झाल्या आहेत. भुईमूग ४००० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५०० हेक्टरवर (६०%) पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन ३००० हेक्टर क्षेत्र असून, २२०० हेक्टरवर (७०%) पेरण्या झाल्या आहेत.
भाजीपाला ८०० हेक्टरपैकी १८० हेक्टर (२०%), चारा पीक मका, घास १०० हेक्टर असून पेरणी ५० हेक्टरवर (५०%) झाली आहे.
भाटघर, नीरा देवघर धरण भागातील धूळवाफेवर पेरलेल्या भाताची व गुंजवणी खोऱ्यात लिफ्टच्या पाण्यावर लवकर लावणीला आलेल्या भाताची लागवड सुरू असल्याचे मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण परिसरातील गावात इतर ठिकाणी धूळवाफेवर सुमारे ७०० हेक्टरवर भाताची (रोपवाटिका) पेरणी झाली होती. मात्र, वळवाचा पाऊस न पडल्याने रोपांची उगवण उशिराने झाली, तर सध्या पाऊस नसल्याने भाताच्या व नाचणीच्या लावण्या रखडल्या होत्या. मात्र, चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत असून भाताची खाचरेही पाण्याने तुडुंब भरली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत भाटघरचा साठा कमी

भाटघर धरण भागात आज १५ मिमी, तर एकूण १५९ मिमी पाऊस झाला आहे. धरण १२.३३ टक्के भरले आहे. मागील वर्षी धरण भागात १९३ मिमी पाऊस होऊन धरण २३ टक्के भरले होते, तर नीरादेवघर धरण भागात आज ४३ मिमी तर एकूण ४४० मिमी पाऊस होऊन धरण १५.२५ टक्के आहे. गतवर्षी ३९० मिमी पाऊस होऊन धरण १२.३३ टक्के भरले होते. वीर धरण भागात आज ०, तर एकूण ५५ मिमी पाऊस झाला असून धरण ६.६३ टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरण भागात पाऊस कमी असून धरणातही पाणीसाठा निम्म्याने कमी आहे, तर नीरादेवघर धरण भागात पाऊस अधिक असून साठाही जास्त आहे. भातासह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. पाऊस झाल्याने फायदा होणार आहे.