शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दुष्काळाचा सामना करण्यासाठी १३१ कोटींचा आराखडा तयार : पाणी पुरवठ्यासाठी ७१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:24 IST

पाऊस कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा, नळ योजनांच्या दुरुस्तीवर अधिक भर इंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी १२ कोटी ४७ लाख ९९ हजार रुपयांचा आराखड्यात समावेश नळ योजना दुरुस्ती २५ कोटी २ लाख २९ हजार, तात्पुरत्या नळ योजना ७ कोटी ७७ लाख,विहिरींतील गाळ काढण्यासाठी ४ कोटी २० लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार

पुणे : दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुणे विभागाचा १३१ कोटी ४६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा प्रशासनाने सोमवारी जाहीर केला. त्यात पाणी पुरवठा आणि पाणी गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर अधिक भर देण्यात आला आहे. केवळ पाणी पुरवठ्यासाठीच ७० कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नळ दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.  पावसाने ओढ दिल्याने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील ६४ गावे व ४४७ वाड्यांवस्त्यांतील १ लाख २० हजार नागरिकांना तर १४ हजार जनावरांना ६५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जून २०१९ पर्यंतचा १३१ कोटी ४६ लाखांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार ४ हजार ३५३ गावे व ८ हजार ९४३ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता असून, त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.    पाऊस पेरणी कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून २०१९ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, विहीरींचे अधिग्रहण करणे, उपसा सिंचन योजनेची विज बिले भरणे अशा विविध विषयांवर कृती आराखड्यात विचार करण्यात आला आहे. विभागातील टंचाई निवारणासाठी ५१६ गावे व १७८२ वाड्यांमध्ये २४४६ नवीन इंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी १२ कोटी ४७ लाख ९९ हजार रुपयांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. विंधण विहिरींच्या दुरुस्तीसाठी ५३२ कोटी, नळ योजना दुरुस्ती २५ कोटी २ लाख २९ हजार, तात्पुरत्या नळ योजना ७ कोटी ७७ लाख, टँकरने पाणी पुरवठ्यासाठी ७० कोटी ९६ लाख ९२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विहिरींच्या अधिग्रहणासाठी ९ कोटी ३९ लाख ३६ हजार तर विहिरींतील गाळ काढण्यासाठी ४ कोटी २० लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.   

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूरFarmerशेतकरी