शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

वारीतले वेगळेपण : वस्त्र ल्यालेली दौंडज खिंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 8:10 PM

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात.

पुणे : रिमझिमणाऱ्या पावसासोबत घाटातली वाट तुडवत विठूनामाचा जयघोष करून वारकरी पंढरीकडे प्रवास करत आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात. या प्रवासात पाळल्या जाणाऱ्या परंपरा, रिंगण यांची ओळख दरवर्षी महाराष्ट्राला करून दिली जाते. 

   या वारीत परंपरा नसली तरी आवर्जून पाळली जाणारी सवय म्हणजे दौडज खिंडीत धुतली जाणारी वस्त्रे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला आळंदीला सुरुवात होते तेव्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली असते आणि जसजशी पालखी पुढे पुढे जाते तसतसा पावसाचा जोर वाढतो आणि आषाढीपर्यंत पेरण्याही उरकलेल्या असतात. त्यामुळे पावसाच्या सोबतीने चिखलाची वाट तुडवतच दरवर्षी वारी केली जाते ज्याची वारकऱ्यांना सवय आहे. अशावेळी काही अडचणींना त्यांना तोंड दयावे लागते त्यातली महत्वाची अडचण म्हणजे कपडे वाळवण्याची. ही परिस्थिती लक्षात घेवून  जेजुरी मुक्काम उरकून पालखी वाल्हे मुक्कामाला निघाली की वाटेतल्या दौंडज खिंडीतल्या भणाणत्या वाऱ्याचा आणि विस्तीर्ण जागेचा उपयोग केला जातो. प्रत्येक ठिकाणी ठराविक काळ असलेली विश्रांती, सकाळी लवकर होणारे प्रस्थान आणि कमीवेळा होणारे सूर्यदर्शन यामुळे कपडे वाळायला अडचण होते. अशावेळी  खिंडीतल्या भल्या थोरल्या डोंगरावर कपडे धुवून सुकवण्याचे काम अनेकजण उरकून घेतात. या कपड्यांमुळे हा संपूर्ण डोंगर रंगीबेरंगी दिसत असतो. कमीतकमी साधनांमध्ये आणि आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा वारकऱ्यांचा साधेपणा या वस्त्र ल्यालेल्या डोंगराकडे बघून पटतो.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीJejuriजेजुरी