शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांची विभागणी करून दमदाटी - राजदीप सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:43 IST

माध्यमांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशी सरसकट विभागणी करून त्यांना दमदाटी केली जात आहे. दुर्दैवाने माध्यमांमध्येही संपादन आणि संतुलन नाहीसे झाले आहे.

पुणे : माध्यमांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशी सरसकट विभागणी करून त्यांना दमदाटी केली जात आहे. दुर्दैवाने माध्यमांमध्येही संपादन आणि संतुलन नाहीसे झाले आहे. बातमी आणि मत, खरे अणि खोटे यातील सीमारेषा पुसट होत आहेत. लेखणीतील ताकदच क्षीण होत चालली आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली.पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिंंबायोसिस सोसायटी यांच्या विद्यमाने दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानमालेच्या पहिल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी सिंंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजूमदार होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर व सिंंबायोसिस विद्यापीठाच्या कुलगुरू रजनी गुप्ते उपस्थित होत्या.सरदेसाई म्हणाले, ‘सर्वप्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत त्यामागील विश्लेषण, वास्तव समजूनच घेतले जात नाही. पेज ३ वरील बातम्यांनी पान एकवरील जागा पटकावली आहे. करणी सेनेच्या बातम्या पहिल्या पानावर झळकतात. बातम्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. पत्रकारांनी तारतम्य न बाळगल्याने माध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे. पाडगावकर यांच्या काळातील पत्रकारितेचा आता लवलेशही पाहायला मिळत नाही.’ डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी दिलीप पाडगावकरांच्या यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबरला पाडगावकरांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांचा सत्कार झाला होता, तो त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला, असे माशेलकर यांनी नमूद केले. पाडगावकरांच्या पत्नी लतिका उपस्थित होत्या.जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमलेल्या पाडगावकर समितीचा अहवाल अजून धूळ खात पडला आहे, असे सांगून सरदेसाई म्हणाले, ‘त्यांनी काश्मीरमधल्या सर्व घटकांची भेट घेऊन चर्चा करून हा अहवाल बनवला होता. त्यामधून प्रश्न सोडवणारा मध्यममार्ग सरकारला गवसला असता; पण राजकीय पक्षांच्या मतभेदांमुळे काश्मीरचा प्रश्न भलतीकडे जातो आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर पाडगावकर समितीचा अहवाल केंद्र सरकारला बाहेर काढून अमलात आणावा लागेल.’ सोशल मीडियावर हल्ला चढवताना सरदेसाई म्हणाले, ‘सोशल मीडिया हे मते व्यक्त करण्याचे मुक्त व्यासपीठ बनले आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सोशल मीडियावर चुकीची माहिती, फोटो प्रसारित केले जातात. त्यामुळे या माध्यमामध्ये अराजक माजलेले आहे. त्यावर सक्षम नियंत्रण आणणे आवश्यक आहे.’

टॅग्स :Puneपुणे