शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांच्या संपामुळे कोटींचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2015 01:39 IST

देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे

पिंपरी : देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तीन लाख, तर देशभरात ८२ लाख गाड्या बंद आहेत. ट्रान्सपोर्टनगरमध्ये सुमारे ६०० ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यावसायिक दिवसाला ७ ते १० हजार रुपये उत्पन्न मिळवतात. या ट्रान्सपोर्ट कार्यालयामध्ये येणारी वाहने खाली करण्यासाठी व भरण्यासाठी असणाऱ्या हमालांची संख्या २ हजार इतकी आहे. प्रत्येक हमाल दिवसाला किमान ६०० रुपये मिळवितात. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन काँग्रेसने बेमुदत बंद पुकारल्याने या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वांचेच दररोजचे उत्पन्न बंद झाले आहे. ट्रकचे वाहक, क्लिनर, बुकिंग एजन्सी यांचे उत्पन्न या व्यवसायाला जोडलेले असते. याशिवाय वाहतूकनगरीतील चहा-नाष्टा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, टायर पंक्चर काढणारे, पानटपरीधारक या सर्वांनाच या बंदचा भुर्दंड सोसावा लागत आहे. याचप्रमाणे शहरातील छोट्या-मोठ्या उद्योजकांचेही वाहतूकदारांच्या बंदीमुळे नुकसान होत आहे. कच्चा माल आणण्यासाठी व तयार झालेला पक्का माल दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी गैरसोय होत आहे. लघुउद्योजक संघटना अध्यक्ष नितीन बनकर म्हणाले, ‘‘बंद पुकारल्यानंतर शनिवार, रविवार आल्याने काही विशेष फरक पडला नाही. शहरातील अनेक कंपन्या रविवारी बंद असतात. यामुळे फारशी अडचण भासली नाही.’’ (प्रतिनिधी)