शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज :  राकेश मोहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:44 IST

देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी..

ठळक मुद्दे कृषी पूरक उद्योगांवर लक्ष देण्याची आवश्यकताकारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाही

पुणे : उद्योग हा देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असतो. उत्पादनक्षम उद्योगांना प्रोत्साहन देताना कृषी आणि पूरक उद्योगांकडे देखील लक्ष द्यायला हवे. कृषी म्हणजे केवळ डाळी आणि धान्य असा विचार न करता त्या जोडीला मत्स्य शेती, दूध आणि दूध प्रक्रिया उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग अशी साखळीच उभारावी लागेल. त्यासाठी दुसरी कृषी क्रांती होण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. राकेश मोहन यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅँण्ड इकोनॉमिक्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात  ‘मूव्हींग इंडिया टून अ न्यू ग्रोथ ट्रॅजेक्टरी’ या विषयावर ते मंगळवारी बोलत होते. टाटा सन्सचे नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर इशात हुसैन उपस्थित होते. डॉ. मोहन म्हणाले, देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी. त्यात गेल्या काही वर्षांमधे वाढ होताना दिसत नाही. त्याच सोबत कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमधे वाढ झाली पाहिजे. या सर्वांसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आवश्यक असल्याने सर्वांना माध्यमिक शिक्षण मोफत दिले पाहीजे. उद्योगांमधे अधिकाधिक तंत्रज्ञान वाढविले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकतील असे उद्योग निर्माण केले पाहिजे. तसेच, तयार झालेल्या उत्पादनाला शाश्वत बाजारपेठ मिळेल, यावर लक्ष द्यायला हवे. देशासह आशियाई देशांची एकूण लोकसंख्या ४ अब्ज आहे. आपल्या आजुबाजूलाच मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. औद्योगिक संस्थांच्या उभारणी पाठोपाठ कृषी आणि पूरक उद्योगाची वाढ झाली पाहिजे. आता धान्य व डाळी यावर आपण थांबता कामा नये. शेतकऱ्यांनाच पिकविलेल्या मालाचे पूरक उद्योग उपलब्ध करुन द्यायला हवेत. आपल्या आहारामधे कोणकोणते घटक वापरले जातात, हे पाहून उद्योगांची निर्मिती करावी. मत्स्यशेती, दूग्ध पदार्थांपासून उपपदार्थ अशा विविध प्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्या जोडीला वाहतूक व साठवणुकीची सुविधा उभारायला पाहिजे, असे डॉ. मोहन म्हणाले. ---कारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाहीदेशाच्या उभारणीसाठी करसंकलन हा एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र, देशात चारचाकी वाहनांची संख्या वाढत असली तरी करदात्यांच्या संख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. उलट एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेत करदात्यांच्या टक्केवारील गेल्या दहा वर्षांत १२वरुन अकरापर्यंत घटझाली आहे. अगदी पुण्याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, अनेक आलिशान संकुले उभारलेली दिसतात. त्या तुलनेत करदात्यांची संख्या फारशी नाही. कराच्या टक्क्यात नव्हे, तर दात्यांच्या संख्येत वाढ झाली पाहीजे, असे डॉ. राकेश मोहन म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती