शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण

By admin | Updated: July 3, 2017 03:24 IST

चुकीच्या पद्धतीने घेतलेले रीडिंग व खराब मीटरमुळे महावितरण कडून पाच ते दहापट वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार वाघोलीतील

लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : चुकीच्या पद्धतीने घेतलेले रीडिंग व खराब मीटरमुळे महावितरण कडून पाच ते दहापट वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार वाघोलीतील सोसायटीधारकांसोबत घडत आहे. साई संस्कृती सोसायटीतील एका घरगुती ग्राहकाला सरासरी ४०० रुपये वीजबिल येत असताना मागील महिन्याचे ९६ हजार रुपये आले असल्याने सोसायटीधारक महावितरणच्या कारभारामुळे हैराण झाले आहेत.
वाघोलीतील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक सध्या महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र वाघोली मध्ये पाहावयास मिळत आहे. महावितरणकडून देण्यात आलेले खराब मीटर व चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या रीडिंगमुळे चालू महिन्यामध्ये सोसायटीतील नागरिकांना दुप्पट, तिप्पट नव्हे तर पाच ते दहापट वाढीव वीजबिले येत आहेत. याचा सर्वाधिक फटका बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या साई संस्कृती सोसायटीला बसला आहे. सोसायटीतील ५०हून अधिक ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत. यामध्ये सुबोध तारळ या ग्राहकाला महिन्याला सरासरी २०० ते ४०० रुपये वीजबिल येत असताना या महिन्यामध्ये ९४ हजार ९९० रुपये बिल आले आहे. त्याचबरोबर इतर घरगुती ग्राहकांनाही ७० हजार, ५५ हजार, २७ हजार अशी वीजबिले आली आहेत. यामुळे ग्राहकांनी शनिवारी भावडी रोड येथील महावितरण कार्यालयावर तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी आणखी ५ ते ६ सोसायटीतील नागरिक वाढीव वीजबिलाच्या तक्रारी घेऊन आले होते. महावितरणतर्फे मीटर तपासून वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे सांगण्यात आले. रविवारी कनिष्ठ अभियंता एन. वैरागर यांनी साई संस्कृती सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांच्या तक्रारी समजावून घेतल्या व वाढीव वीजबिल कमी करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
महावितरणच्या या अशा कारभारामुळे सर्व कामे सोडून महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने सोसायटीधारक हैराण झाले आहेत. मीटर रीडिंग घेताना चुकत असल्यास संबंधितावर कारवाई करावी व खराब मीटर बदलून मिळावेत अशी मागणी सोसायटीधारक करीत आहे.

कार्यालय विभाजनाची प्रतीक्षाच

वाघोली शाखा कार्यालयाचे विभाजन करून वाघोली शाखा १, वाघोली शाखा २, वाघोली ग्रामीण असे विभाजन करण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रस्तावित आहे.

४० हजार ग्राहक संख्या असलेल्या वाघोली शाखेमध्ये कर्मचारी कमी असल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर अधिकारी व कर्मचारी वर्गाला ग्राहकांच्या तक्रारींना तोंड देताना चांगलीच दमछाक होत आहे. विभाजन प्रस्ताव रखडल्याने वाघोली कार्यालय विभाजनाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागत आहे.

वाघोलीतील सोसायटीधारकांना वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा वरिष्ठ कार्यालयामध्ये सोसायटीधारक ठिय्या आंदोलन करतील.
- आशिष गलांडे,
सोसायटीधारक