शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 13:18 IST

युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते, हा तर राजकारणाचा खेळ

पुणे: आधी मराठा, ब्राह्मण वाद लावला. मग भांडारकर फोडले. जेम्स लेन कुणी वाचला पण नसेल... हे पुस्तक बंद करा हे पहिल्यांदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. पण त्यांना वाईट ठरविण्यात आले. हे सगळे शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकारण आहे. हा सगळा जातीचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर सुरू झाला आहे, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारार्थ कोथरूडमधील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते.

जरांगे पाटील यांची आरक्षण मागणी तांत्रिकदृष्ट्या निरर्थक 

मनाेज जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी तांत्रिकदृष्ट्या होऊ शकणार नाही. तुम्हाला राजकारणी चुकीचे सांगत आहेत. त्यासाठी नवा कायदा करावा लागेल. ही केवळ महाराष्ट्रापुरते राहणार नाही तर उद्या इतर राज्ये उठतील आणि मागणी करतील. मागणी करताना ते पूर्ण करतील का? हे पाहायला हवे. केवळ स्वतःच्या राजकारणासाठी तुमच्यात भांडणे लावली जात आहेत. हा साधुसंतांचा महाराष्ट्र, फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तोच महाराष्ट्र आज चाचपडत आहे. निवडून येण्यासाठी जात वापरतात आणि मग निवडून आल्यावर दुसरी जात बघतात. राष्ट्रवादी काँग्रेसने यात भर घातली, असेही ठाकरे म्हणाले. आरक्षण हे सगळे शिक्षण नोकऱ्यासाठी मागत आहेत. आता सरकारी नोकऱ्याच संपल्या आहेत. भरती होत नाही. मग आपण कुठल्या आरक्षणाच्या गोष्टी करत आहोत. कुठून आरक्षणातून नोकऱ्या मिळणार आहेत? ही लोक फक्त तुमच्यात आग लावत आहेत. आम्ही रोजगार, वीज, नोकऱ्या देऊ यावरच ५२ सालापासून निवडणुका होताहेत. यात काही बदल झालेला नाही, असेही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील मतांचा अपमान

महाराष्ट्रातल्या मतांचा आज अपमान झाला आहे. शिवसेना भाजप पूर्ण बहुमतात होती. त्यानंतर अचानक पहाटेचा शपथविधी झाला आणि तो मोडला. इतकी वर्षे युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते आणि म्हणे मी मुख्यमंत्री. ही तुमच्या मतांची प्रतारणा नव्हे का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. हे सगळे हसण्यावरी नेताय. तो मतदारांच्या अस्तित्वाचा अपमान आहे. आपण राजकारण खेळ समजतोय. दुधाचे भाव, विजेचे भाव राजकारणी ठरवतात. कुणी कुणाबरोबर जाते. कारण तुम्ही राजकारण हसण्यावरी नेत आहात. हा विनोदाचा नव्हे तर गंभीर विषय आहे. नेत्यांच्या पापांवर पांघरून घालायचे का? तर हा आमचा जातीचा आहे. अशाने सगळे बरबाद होऊन जाईल. आपण महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस