शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर, नीरा देवघरचा पाणीसाठा निम्माच

By admin | Updated: February 1, 2015 23:55 IST

तालुक्यातील नीरा देवघर धरणात ४१ टक्के, तर भाटघर धरणात ७३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी नीरा

भोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात ४१ टक्के, तर भाटघर धरणात ७३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी नीरा देवघरमधून ७५० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून १ हजार ८९७ क्युसेक्सने पाण्याचा विर्सग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत नीरा देवघर धरणात फक्त (३८ टक्केच) म्हणजे निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील सहा महिन्यांपासून पाणी सोडले जात आहे. यामुळे धरण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले नीरा देवघर धरण पावसाळ्यात १०० टक्के भरले होत. वीजनिर्मितीसाठी धरणातून १६ आॅगस्टपासून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. आत्तापर्यंत ५९ टक्के पाणी खाली सोडण्यात आले आहे. यामुळे धरणात सध्या ४१ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर, भाटघर धरणातून वीजनिर्मितीसाठी मागील तीन महिन्यांपासून १८९७ क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. काही काळ विसर्ग बंद ठेवण्यात आला होता. धरणात सध्या ७३ टक्के पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणाच्या काठावरील दोन्ही बाजूंच्या अनेक गावांना धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. पाणी सोडण्याचा वेग असाच राहिल्यास येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे हा विसर्ग त्वरित थांबविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)