शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वारूळवाडी ग्रामपंचायत प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST

जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नारायणगाव, वारुळवाडी ही शहरे हॉटस्पॉट झाली आहेत. वाढता प्रादुर्भाव पाहता ...

जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नारायणगाव, वारुळवाडी ही शहरे हॉटस्पॉट झाली आहेत. वाढता प्रादुर्भाव पाहता या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक तथा माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासंदर्भात आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार ग्रामपंचायत वारूळवाडी येथील कोरोना दक्षता समितीच्या १५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीनुसार वारूळवाडी ग्रामपंचायतीने येथील रा. प. सबनीस विद्यामंदिरातील मुख्याध्यापक यांना त्यांच्या संस्थेतील शिक्षक यांची यादी तसेच शिक्षकांना १५ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात द्याव्यात अशा आशयाचे पत्र दिले होते. या पत्रावर अंमलबजावणी ऐवजी शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उलट ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देऊन आम्ही सर्वेक्षण करण्यास तयार आहोत. मात्र आमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी व मुले यांची कोरोना महामारी संदर्भात सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारावी व ग्रामपंचायतीने यासंदर्भात लेखी पत्र द्यावे, अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे. या पत्रामुळे कोरोनाचे सर्वेक्षण कसे करायचे? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला प्रश्न पडला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रा. प. सबनीस विद्यामंदिर या शाळेकडून मिळालेल्या पत्रानंतर वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामविकास अधिकारी गवारी यांनी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून शाळेच्या पत्राची माहिती सादर केली आहे .

याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती काळात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान कोणी शिक्षक करत असेल तर त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच जिल्हा परिषद सेवा नियम १६७ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रा. प. सबनीस विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य रवींद्र वाघोले म्हणाले की, शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडे केलेला पत्रव्यवहार मध्ये काही चुकीचे वाटत नाही . मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दिनांक १६ एप्रिलचे पत्र आहे. या पत्रानुसार सर्व शिक्षकांची यादी , मस्टरच्या झेरॉक्स ग्रामपंचायतीला सुपूर्त करण्यात आलेल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी यांचे १६ एप्रिलच्या पत्रानुसार सर्व शिक्षकांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी दिनांक १७ एप्रिल रोजी संपर्क ही साधलेला आहे. शिक्षकांनी त्यांच्या शंका निरसनासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला पत्र दिलेले आहे .त्या पत्रात सर्वेक्षण करणार असा उल्लेख केलेला आहे . शिक्षकांची नावे देण्यामध्ये आमचे कार्यालयाकडून कोणताही विलंब झालेला नाही. शाळेतील शिक्षकांनी ग्रामपंचायतीमध्ये येण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले की, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी , गटविकास अधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे करिता शाळेला पत्र दिले होते. सर्वेक्षण करिता शिक्षकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे असताना शाळेकडून झालेला पत्रव्यवहार हा चुकीचा आहे. काही विशिष्ट व्यक्तींकडून आकसापोटी किंवा जाणीवपूर्वक असा पत्रव्यवहार केला असावा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांनी कोरोना सर्वे आदेश दिलेले असताना आदेशाचा अवमान करून ग्रामपंचायत प्रशासनाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.