शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रमाच्या गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

---- अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाच ते सहा मंगल कार्यालये आहेत. साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी ...

----

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाच ते सहा मंगल कार्यालये आहेत. साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असतात. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. याकडे पोलीस व प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

अवसरी खुर्द येथे १५ ते २० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुका तहसीलदार व पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी फाटा, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर फाटा, पारगाव या गावामध्ये अंदाजे ७ ते ८ लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लग्न समारंभासाठी फक्त २०० वऱ्हाडी मंडळींनाच परवानगी दिली असताना वरील कार्यालयात साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असतात.

लग्न कार्यासाठी स्थानिक, पुणे, मुंबई व जिल्ह्यातून वऱ्हाडी मंडळी येत असतात. मंगल कार्यालयाचे मालक प्रशासनाचे कोणतेच नियम पाळत नसून मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. तोंडाला मास्क न लावता वऱ्हाडी मंडळी सर्रास फिरताना पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे लग्न कार्यानंतर डीजेच्या तालावर रात्रभर वरती चालू असतात. मंचर पोलीस स्टेशनला कळवूनदेखील कोणतीच कार्यवाही होत नाही. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

---

आंबेगावच्या पूर्व भागात रुग्ण वाढले

तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, मेंगडेवाडी, कठापूर, मंचर आदी गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे आणि मंचर पोलीस ठाणे व आंबेगाव तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना नियमांची काटेकोर अंमलबाजवणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्याने मंगल कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी घेवून मंगल कार्यालयात शुभविवाह करण्यासाठी परवानगी द्यावी व यावर ग्रामपंचायत कार्यालयाचे लक्ष ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी द्यावेत व तसेच रात्रभर डीजेच्या तालावर चालणाऱ्या वरातींवर बंदी आणावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.