शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

जिल्ह्यात १६ कारखान्यांचे ४९ लाख टन ऊसगाळप, ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.३६ चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.चालू गळीत हंगामात मंत्री समितीच्या निर्णयानुसार २० आॅक्टोबरला राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, दुसरीकडे उसाचे जादा क्षेत्र असल्याने १ आॅक्टोबरलाच गाळपाची परवानगी मिळावी, असे साखर कारखानदारांचे म्हणणे होते. उशिरा परवानगी दिल्याने प्रत्यक्षात साखर कारखाने सुरू होण्यासाठी ५ नोव्हेंबर उजाडले. त्यामुळे वाढलेले उसाचे क्षेत्र पाहता, साखर कारखान्यांना वेळेत उसाचे गाळप करणे जिकिरीचे बनणार आहे. त्यातच तुटणाºया उसाला हुमणीचा पादुर्भाव झाल्याने तुटणाºया उसाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी जोमाने सुरू आहेत. प्रत्येक कारखाना आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक कारखान्यांना स्वत:च्याच कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने अनेक कारखान्यांनी चालू हंगामात गेटकेन ऊस आणण्यास टाळाटाळ केली आहे. तर, कार्यक्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्या भागांमध्ये कारखान्यांनी प्राधान्याने ऊसतोडी दिल्या आहेत.जिल्ह्यातील अनेक कारखान्याचा ‘डे’ चा साखर उतारा पावणेबारावर पोहोचला आहे. तर, ११.३६ चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी मिळून ४९ लाख ८४ हजार ४९७ मे. टन ऊसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ५ लाख ३२ हजार २८० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ७५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेत इंदापूर कारखान्याने ऊस गळितात आघाडी घेतली आहे.तर, ५ लाख ३१ हजार ९९० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ६६ हजार २०० पोत्याचे उत्पादन घेत बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने दुसरा, तर ४ लाख ५५ हजार १४० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ८५ हजार पोत्याचे उत्पादन घेत दौंड शुगर कारखान्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.तर, ११.६४चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर, ११.२४ चा साखर उतारा ठेवून भीमाशंकरने व १०.९८चा साखर उतारा ठेवून विघन्हर कारखान्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक ठेवला आहे.साखरेचा गोडवा वाढला...नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने साखर कारखान्यांसाठी फायदेशीर समजले जातात. हा कालावधी ‘हाय रिकव्हरी पिरीयड’ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत थंडीचे प्रमाण चांगले असल्याने कारखान्यांच्या साखर उताºयात वाढ होऊन आर्थिक फायदा होतो. गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने उसाचा गोडवा वाढला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे