शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

जिल्ह्यात १६ कारखान्यांचे ४९ लाख टन ऊसगाळप, ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.३६ चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.चालू गळीत हंगामात मंत्री समितीच्या निर्णयानुसार २० आॅक्टोबरला राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, दुसरीकडे उसाचे जादा क्षेत्र असल्याने १ आॅक्टोबरलाच गाळपाची परवानगी मिळावी, असे साखर कारखानदारांचे म्हणणे होते. उशिरा परवानगी दिल्याने प्रत्यक्षात साखर कारखाने सुरू होण्यासाठी ५ नोव्हेंबर उजाडले. त्यामुळे वाढलेले उसाचे क्षेत्र पाहता, साखर कारखान्यांना वेळेत उसाचे गाळप करणे जिकिरीचे बनणार आहे. त्यातच तुटणाºया उसाला हुमणीचा पादुर्भाव झाल्याने तुटणाºया उसाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी जोमाने सुरू आहेत. प्रत्येक कारखाना आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक कारखान्यांना स्वत:च्याच कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने अनेक कारखान्यांनी चालू हंगामात गेटकेन ऊस आणण्यास टाळाटाळ केली आहे. तर, कार्यक्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्या भागांमध्ये कारखान्यांनी प्राधान्याने ऊसतोडी दिल्या आहेत.जिल्ह्यातील अनेक कारखान्याचा ‘डे’ चा साखर उतारा पावणेबारावर पोहोचला आहे. तर, ११.३६ चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी मिळून ४९ लाख ८४ हजार ४९७ मे. टन ऊसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ५ लाख ३२ हजार २८० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ७५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेत इंदापूर कारखान्याने ऊस गळितात आघाडी घेतली आहे.तर, ५ लाख ३१ हजार ९९० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ६६ हजार २०० पोत्याचे उत्पादन घेत बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने दुसरा, तर ४ लाख ५५ हजार १४० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ८५ हजार पोत्याचे उत्पादन घेत दौंड शुगर कारखान्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.तर, ११.६४चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर, ११.२४ चा साखर उतारा ठेवून भीमाशंकरने व १०.९८चा साखर उतारा ठेवून विघन्हर कारखान्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक ठेवला आहे.साखरेचा गोडवा वाढला...नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने साखर कारखान्यांसाठी फायदेशीर समजले जातात. हा कालावधी ‘हाय रिकव्हरी पिरीयड’ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत थंडीचे प्रमाण चांगले असल्याने कारखान्यांच्या साखर उताºयात वाढ होऊन आर्थिक फायदा होतो. गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने उसाचा गोडवा वाढला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे