शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरणसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: July 4, 2017 03:29 IST

खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात २० टक्क्याने वाढ झाली आहे.
खेड तालुक्याच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवर विशेषत: भीमाशंकर अभयारण्य परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली.
यामुळे भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. चासकमान धरणाच्या जलाशयात उन्हाळ्याच्या अखेरीस ५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तसेच पाणीपातळी ६३०.५३ होती तर एकूण साठा ३९.१० दलघमी होता. उपयुक्त पाणीसाठा ११.९१ दलघमी होता.
परंतु सध्या भीमाशंकर, खरोशी, मंदोशी, शिरगाव, भोरगिरी, धामणगाव, आव्हाट, वाळद, डेहेणे, वाडा, सह धरण परिसरात पावसाच्या दमदार हजेरीमुळे धरण परिसरात २६९ मिली मीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याात तब्बल २० टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या पाणीपातळी ६३७.२६ आहे.
एकूण साठा ८२.७६ दलघमी तर उपयुक्त साठा ५५.५७ दलघमी तसेच पाणी टक्केवारी २५.९० टक्के इतकी आहे. चासकमान धरण परिसरात पाऊस असाच सुरू राहिल्यास खेडसह शिरूर तालुक्याची पाणी समस्या दूर होणार आहे. या परिसरात आणखी दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी निश्चित वाढेल.