शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 13:04 IST

Remdesivir News : पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत असलेल्या रेमडेसिविरवरून (Remdesivir News) सध्या राज्यातील राजकारणामध्ये मोठा वाद रंगला आहे. त्यातच काल रात्री एका फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने त्यावरून भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. (Coronavirus in Maharashtra ) दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. (Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations on BJP)

नवाब मलिक म्हणाले की, काल रात्री औषधांचा साठा आहे अशी खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ही बाब समजताच विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि आमदार पराग अळवणी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना जर माहिती मिळाली तर ते तपास करतात. मग राजेश डोकानियांना सोडवण्यासाठी राज्यातले दोन दोन विरोधीपक्षनेते आणि दोन  आमदार का गेले होते. काही दिवसांपूर्वी हेच भाजपाचे नेते दीव दमणला गेले होते. रेमडेसिविरचे आम्ही आणून वाटप करू, असे त्यांनी सांगितले होते. भाजपाची लोकं साठा मिळू नये यासाठी प्रयत्न करताहेत का. रेमडेसिविरचा साठा करून स्वत; वाटण्याची किंवा विकण्याची भूमिका घेताहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.  

दरम्यान, एफडीएने रात्री आदेश दिल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडण्यात आलं. तसेच गरज वाटल्यास बोलावले जाईल असे सांगितले. पोलीस हे जनतेसाठी काम करतात. साठा असेल तर जप्त करून जनतेला देण्याचं का काम करते. मग यांना चौकशीसाठी बोलावलं तर भाजपावाले  का घाबरतात. वकिलीसाठी का जातात. देवेंद्रजी वकील आहेत. ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की संबंध असल्याने वचाव करत आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस एफडीए कारवाई करू शकतात. मात्र फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी भाजपाचे नेते का धावून गेले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. याच्यामागचं काय राजकारण आहे भाजपाने स्पष्ट करावं, असे आव्हानही मलिक यांनी दिले.  देशात सात कंपन्यांना वितरण वितरण आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची करण्याचा अधिकार देण्यात आले आहे. तर सतरा कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. ते उत्पादन करून या दोन कंपन्याना देऊ शकतात. या सात कंपन्यांना स्वत: उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातबंदी झाल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विक्रीसाठी परवानगी द्या म्हणून महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी ब्रुक फार्माचे राजेश डोकानिया हे दरेकरांसोबत शिंगणेंना भेटले होते. परवानगी मिळाल्यास रेमडेसिविर देऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली होती, असेही मलिक यांनी यावेली सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPraveen Darekarप्रवीण दरेकर