शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

“भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 20:15 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जम्मू: अनुच्छेद रद्द करून जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष दर्जा देण्यात यावा, यासाठी स्थानिक नेते आग्रही असल्याचे दिसत आहेत. तसेच अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत कोणताही फरक नाही, अशी टीका केली आहे. (pdp mehbuba mufti criticized modi govt and bjp over article 370)

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

पाकिस्तानशी पुन्हा एकदा चर्चा करायला हवी. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू व्हायला हवा, असा सल्ला देत पाकिस्तानचे नाव काढल्यावर पंतप्रधान मोदी नाराज का होतात, अशी खोचक विचारणा केली आहे. अनुच्छेद ३७० पाकिस्तान किंवा चीनने दिलेले नाही. ते रद्द करण्याचा निर्णयाच्या फेरविचार करायला हवा, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. 

भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

भाजप ७० वर्ष संघर्ष करू शकते तर आपण का नाही?

भाजप ७० वर्ष संघर्ष करते आणि कलम ३७० बेकायदेशीर आणि असंवैधानिकपणे रद्द करते, तर आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष का करत नाही, अशी विचारणा करत मला लोकांना सांगायचे आहे की, जेव्हा तुम्ही धर्माच्या आधारे भारताची निवड केली, तेव्हा काश्मिरींनी तुमचे समर्थन केले तर बाकीचे पाकिस्तानात गेले. आम्ही त्यावेळी धर्माचे समर्थन केले नाही, आम्ही सरकारी सैन्याचे व बंधुत्वाचे समर्थन केले. मात्र, राज्यघटनेचा भंग करून आज भाजपने जम्मू-काश्मीरचे अस्तित्व संपवले, अशी टीकाही मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. 

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

दरम्यान, भाजप आपल्याच देशवासीयांवर संशय घेतला. इस्रायलच्या तंत्रज्ञान वापरत हेरगिरी केली, असा आरोप करत जम्मू-काश्मीरची जनता घटनात्मक, लोकशाहीच्या आणि शांततापूर्ण मार्गांनी लढा देईल. मग तो लढा कितीही महिने किंवा वर्ष चालला तरी चालेल. पण आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू, असा पुनरुच्चार मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.   

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी