शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

“भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 8:13 PM

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जम्मू: अनुच्छेद रद्द करून जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष दर्जा देण्यात यावा, यासाठी स्थानिक नेते आग्रही असल्याचे दिसत आहेत. तसेच अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत कोणताही फरक नाही, अशी टीका केली आहे. (pdp mehbuba mufti criticized modi govt and bjp over article 370)

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

पाकिस्तानशी पुन्हा एकदा चर्चा करायला हवी. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू व्हायला हवा, असा सल्ला देत पाकिस्तानचे नाव काढल्यावर पंतप्रधान मोदी नाराज का होतात, अशी खोचक विचारणा केली आहे. अनुच्छेद ३७० पाकिस्तान किंवा चीनने दिलेले नाही. ते रद्द करण्याचा निर्णयाच्या फेरविचार करायला हवा, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. 

भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

भाजप ७० वर्ष संघर्ष करू शकते तर आपण का नाही?

भाजप ७० वर्ष संघर्ष करते आणि कलम ३७० बेकायदेशीर आणि असंवैधानिकपणे रद्द करते, तर आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष का करत नाही, अशी विचारणा करत मला लोकांना सांगायचे आहे की, जेव्हा तुम्ही धर्माच्या आधारे भारताची निवड केली, तेव्हा काश्मिरींनी तुमचे समर्थन केले तर बाकीचे पाकिस्तानात गेले. आम्ही त्यावेळी धर्माचे समर्थन केले नाही, आम्ही सरकारी सैन्याचे व बंधुत्वाचे समर्थन केले. मात्र, राज्यघटनेचा भंग करून आज भाजपने जम्मू-काश्मीरचे अस्तित्व संपवले, अशी टीकाही मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. 

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

दरम्यान, भाजप आपल्याच देशवासीयांवर संशय घेतला. इस्रायलच्या तंत्रज्ञान वापरत हेरगिरी केली, असा आरोप करत जम्मू-काश्मीरची जनता घटनात्मक, लोकशाहीच्या आणि शांततापूर्ण मार्गांनी लढा देईल. मग तो लढा कितीही महिने किंवा वर्ष चालला तरी चालेल. पण आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू, असा पुनरुच्चार मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.   

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी