शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 5:09 PM

Maharashtra Flood: आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: राज्यात विविध ठिकाणी झालेल्या प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकार मोठी घोषणा करू शकते, असे सांगितले जात आहे. त्यातच आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. (ncp rohit pawar says central govt should help maharashtra in flood situation) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्धव ठाकरेंपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेकांनी चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. यानंतर आता मदत आणि पूनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्राकडे मदतीचे आवाहन केले आहे. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी

अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेलं. तसंच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. राज्यपाल भतग सिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Politicsराजकारणchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSatara Floodसातारा पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार