उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत; फडणवीसांची टीका

By मोरेश्वर येरम | Published: November 28, 2020 11:56 AM2020-11-28T11:56:41+5:302020-11-28T16:28:49+5:30

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. 

I have not seen a threatening Chief Minister like Uddhav Thackeray says devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत; फडणवीसांची टीका

उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत; फडणवीसांची टीका

Next
ठळक मुद्देठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर भाजपचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोलठाकरे सरकारची काळी पत्रिका नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशनसरकारने वर्षभरात केवळ स्थगिती देण्याचे निर्णय घेतले

मुंबई
राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ''हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही'', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकार सर्वच बाबतीत सपशेल अपयशी ठरल्याचं सांगत सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं सांगितलं. सरकारने पहिल्या वर्षात फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचं काम केल्याची टीका फडणवीसांना केली. 

अर्णब, कंगना प्रकरणात सरकार तोंडावर आपटलं
सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि मुंबई हायकोर्टाने कंगना प्रकरणात दिलेल्या निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. ''सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयातूनच सरकारच्या कामगिरीची माहिती कळते. कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तर मुंबई हायकोर्टानेही कंगनाविरोधातील कारवाई अप्रमाणिक आणि अशुद्ध हेतूने केल्याचा मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत संजय राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणारी नाही असं कोर्टाने झापलं'', अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. 

शेतकऱ्यांना दिलेलं वचन मुख्यमंत्री विसरले
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना न दिलेलं वचन मुख्यमंत्र्यांना लक्षात राहीलं, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन ते विसरले, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. धान उत्पादकांना बोनस दिला याबाबत सरकारचं स्वागतच आहे पण सोयाबीन आणि कापूर उत्पादकांचं काय? त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी फडणवीसांनी केली. 

मराठा आरक्षणावरुन सरकारचा घोळ
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अभूतपूर्व घोळ घातला असून सरकारचं धोरण हे केवळ वेळकाढूपणाचं असल्याचं फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत वकील आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं फडणवीस म्हणाले. सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छाच नाही हे यातून दिसून येतं, असंही ते पुढे म्हणाले.

 

Web Title: I have not seen a threatening Chief Minister like Uddhav Thackeray says devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.