शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर घणाघात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणाल्या...

By कुणाल गवाणकर | Published: November 26, 2020 5:39 PM

ठाकरे सरकारला शुभेच्छा देत पंकजा मुंडे बरसल्या; विविध विषयांवरून जोरदार टीका

मुंबई: राज्यातल्या ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षी आगळंवेगळं सरकार सत्तेवर आलं. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात वारंवार गोंधळ पाहायला मिळतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी कोरोना संकट, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, मराठा आणि धनगर आरक्षणावर भाष्य करत सरकारचा समाचार घेतला.'सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यांना मतदारांकडून जनादेश नव्हता. मात्र तरीही त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे सरकार टिकवणं याच गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं. जनहित त्यांच्यासाठी प्राधान्याचा विषय नव्हता,' अशी टीका केली. अंगावर येणाऱ्यांच्या मागे हात धुवून लागण्याचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'लढाई मुद्द्यांची असावी, वैयक्तिक नसावी. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपावी. आम्हीदेखील जपू,' असं मुंडे म्हणाल्या.अनेक निर्णयांमधून सरकारचा गोंधळ दिसत असल्याचं पंकजा यांनी सांगितलं. 'सरकार स्थापन झाल्यावर लगेच टीका करणं मला प्रशस्त वाटत नाही. त्यामुळेच सुरुवातीला कोरोना संकटात मी टीका केली नाही. पण त्यानंतर अनेकदा सरकार गोंधळलेलं दिसलं. शाळा सुरू करण्याचा निर्णय असो वा मग अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा, सरकारमधील गोंधळ वारंवार समोर आला,' अशी टीका त्यांनी केली.मराठा आरक्षणाबद्दल आमच्या सरकारची भूमिका अतिशय सकारात्मक होती. पण आताच्या सरकारच्या भूमिकेमुळे समाजात नाराजी आणि संताप आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नही कायम आहे. धनगरचं धनगड करण्यासाठी ७० वर्षे लागतात, ही बाब दुर्दैवी आहे, असं पंकजा म्हणाल्या. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारनं हात थोडा सैल सोडावा. राज्याला केंद्राची मदत मिळणं क्रमप्राप्त आहे. पण राज्य सरकारनं आधी मदत करून मग केंद्राकडे पाठपुरावा करावा, असा मार्ग वापरता येतो, असं पंकजा यांनी सुचवलं.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा