शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

Video: अण्णा, उपोषण थांबवा! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घातली अण्णा हजारेंना गळ

By प्रविण मरगळे | Updated: January 22, 2021 21:22 IST

पंतप्रधानांना पत्र पाठवली तरी उत्तर मिळत नाही यावर अण्णा नाराज आहेत असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता.

ठळक मुद्देअण्णा हजारेंचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत आणि त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणारमागच्या काळात ज्या मागण्या मान्य झाल्या त्यावर कशा अंमलबजावणी होत आहे, त्याबद्दल सगळं समजून घेतलं भाजपा नेत्यांनी घेतली समाजसेवक अण्णा हजारेंची भेट, ३० जानेवारीपासून अण्णांचं उपोषण

राळेगणसिद्धी – येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे, मात्र अण्णा हजारेंचे हे आंदोलन स्थगित करण्याचे प्रयत्न भाजपाच्या नेत्यांकडून सुरू झालेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली.

या भेटीनंतर भाजपा नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णांशी चर्चा केली आहे, अण्णांचे म्हणणं समजून घेतल्या आहेत, मागच्या काळात ज्या मागण्या मान्य झाल्या त्यावर कशा अंमलबजावणी होत आहे, त्याबद्दल सगळं समजून घेतलं आहे, या गोष्टी केंद्र सरकारकडे मांडून त्याबाबत काही निर्णय करून घ्यायचे आहेत, अण्णा हजारे ही केवळ व्यक्ती नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण आहे, ते स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढत असतात. अण्णा हजारेंचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत आणि त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधानांना पत्र पाठवली तरी उत्तर मिळत नाही यावर अण्णा नाराज आहेत असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला त्यावर फडणवीस म्हणाले की,  मागच्या काळात सरकारकडून काही उत्तरं मिळालं नाही, परंतु अण्णा हजारे यांच्या पत्राला उत्तर इतरांप्रमाणे देता येत नाही, तर चर्चा करूनच उत्तर द्यावं लागतं असं मी अण्णांना सांगितले केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मला स्वत: सांगितले चर्चा करा, त्यांना योग्य ते उत्तर देऊ असं म्हणाले होते, मागच्यावेळी लोकपालाचा मुद्दा होता तेव्हा आमच्या समितीने ड्राफ्ट केला होता, मधल्या काळात आमचं सरकार गेले, आता नवीन सरकारसोबत ड्राफ्टबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अण्णा हजारे काय म्हणाले?

२०११ मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठविले. त्याचे उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांचे शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसanna hazareअण्णा हजारेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी