शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: सरकारने डिलीट केलेले ‘हे’ ट्विट लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत तर नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 6:09 PM

1 / 10
देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या मागणीला वेग आला आहे. या संदर्भात निर्णय घेण्याचे आवाहन अनेक राज्यांनी केंद्र सरकारला केले आहे. काही तज्ज्ञांचेही हेच मत आहे. सध्या केंद्र सरकार या सूचनांवर विचार करीत आहे.
2 / 10
बरेच राज्य लॉकडाऊन वाढवण्याबाबत अनुकूल आहेत. देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा पाहता व्हायरसचा प्रसार थांबविणे कठीण होईल असे तेलंगानाचे सीएम केसीआर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. १४ एप्रिलनंतही लॉकडाऊन वाढवावा असं त्यांचे मत आहे.
3 / 10
दुसरीकडे, सरकारी पोर्टल mygovindia च्या ट्विटर हँडलवरून मंगळवारी दुपारी लॉकडाऊन वाढवण्याबाबतचे वृत्त 'निराधार' असल्याचं सांगितलं गेलं. हे ट्विट काही मिनिटांतच हटविण्यात आले. अशा परिस्थितीत ट्विट हटविणे हे सरकार लॉकडाऊन वाढविण्याच्या गंभीरपणे विचार करीत असल्याचे चिन्ह आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
4 / 10
MyGov इंडियाने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या हवाल्याने 21 दिवसांचे लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही. ट्विटमध्ये याला फॅक्ट चेक असे म्हटले होतं. ट्विट असं होते की, 'लॉकडाऊन विस्ताराच्या बातम्या निराधार असून सरकारने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही अशा अफवांना बळी पडू नका.
5 / 10
काही मिनिटांत असे काय झाले की ही वस्तुस्थिती तपासणी चुकीची झाली? सरकारी हँडल वरून याविषयी वृत्त लिहिण्यापूर्वी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
6 / 10
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन 3 जूनपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. त्यांनी बीसीजीच्या अहवालाचा हवाला दिला की ३ जूनपर्यंत लॉकडाऊन शिफारस केली आहे. लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय मोकळ्या मनाने करा असं आवाहन त्यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे.
7 / 10
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही जेश्चरमधील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी तिसरा आठवडा खूप महत्वाचा आहे. ते म्हणाले की 14 एप्रिलनंतर जे काही निर्णय घेतले जातात ते लोकांनी पाळले पाहिजे. अर्थव्यवस्थेचे संकट उद्भवू शकते परंतु आरोग्यावर परिणाम नाही.
8 / 10
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केरळ युनिटने पीएम मोदी यांना पत्र लिहून लॉकडाऊन तीन आठवड्यांसाठी वाढविण्याची मागणी केली आहे.तसेच केंद्र आणि डब्ल्यूएचओच्या सल्लागारांच्या सूचनांची प्रतीक्षा महाराष्ट्र सरकार करत आहे. लॉकडाऊनचा निर्णय 10 ते 14 एप्रिल दरम्यान होईल.
9 / 10
कर्नाटकचे सीएम बीएस येडियुरप्पा यांनीही सांगितले आहे की,'सध्याची परिस्थिती असल्याने 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन बंद होईल, असं वाटत नाही. जेव्हा लोक पूर्णपणे सहकार्य करतील आणि घर सोडणार नाहीत तेव्हाच हे होईल. उत्तर प्रदेशातही लॉकडाऊन हटविण्याची शक्यता कमी आहे.
10 / 10
मध्य प्रदेशचे सीएम शिवराज सिंह यांनीही लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचे संकेत दिले आहेत. लोकांचे जीवन अधिक निकडीचे आहे. अर्थव्यवस्था पुनर्संचयित होऊ शकते परंतु लोक मेले तर आपण त्यांना परत कसे आणू? म्हणूनच गरज पडल्यास लॉकडाऊन वाढवू असं त्यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार