शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणाला बँका देतात तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST

परभणी : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार व्यापाऱ्यांना कर्ज व इतर सुविधा बँकांकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, अशी ...

परभणी : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार व्यापाऱ्यांना कर्ज व इतर सुविधा बँकांकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, अशी तक्रार येथील परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न व्यापारी करतात. मात्र, त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. छोट्या तथा मध्यम व्यापाऱ्यांसाठी मुद्रा लोन योजना घोषित करण्यात आली. परंतु, बँकेमार्फत जुन्याच थकबाकीदार ग्राहकांना मुद्रा लोन देऊन बंद खाते पुनरुज्जीवित केले. साधारण व्यापाऱ्यांना किंवा बेरोजगारांना या योजनेचा लाभ झाला नाही. तसेच पंतप्रधानांनी सप्टेंबर २०२० मध्ये सर्व व्यावसायिक कर्जदारांना अतिरिक्त २० टक्के कर्ज विनातारण देण्याची घोषणा केली; परंतु बँकांनी सर्वसाधारण व्यावसायिकांना अधिकचे तारण देऊनही २० टक्के कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे मोरोटोरियम कालावधीचे कर्जावरील व्याज पुनर्गठन करणे अथवा स्वतंत्र खाते निर्माण करून तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज परतफेड करण्याच्या धोरणाचाही बँकांनी अवलंब केला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासकीय घोषणांची पूर्तता करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सचिन अंबिलवादे, अशोक माटरा, रमेश पेकम, अफजल पाडेला, आदींनी केली आहे.