शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

कृषी स्वावलंबनच्या वीज पुरवठ्यासाठी जि.प., महावितरणची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:50 AM

परभणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्र्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लभार्थ्यांना सिंचन विहिरीवर वीज पुरवठा देण्यासाठी जिल्हा ...

परभणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्र्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लभार्थ्यांना सिंचन विहिरीवर वीज पुरवठा देण्यासाठी जिल्हा परिषद व महावितरणच्या वतीने १२ ते १४ जानेवारी दरम्यान जिल्हा परिषदेत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय सोमवारी जि.प.मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१७-१८ पासून राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नवीन विहीरीसाठी २ लाख ५० हजार रुपये तर इनर बोअरवेलसाठी २० हजार, पंपसेटसाठी २५ हजार, वीज जोडणीसाठी १० हजार रुपये, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. परभणी जिल्हा परिषदेने २०१७-१८ या वर्षांपासून या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड केली. त्यानंतर लाभार्थ्यांनी विहिरीही तयार केल्या; परंतु महावितरणकडून त्यांना विहिरीवर मोटार बसविण्यासाठी नव्याने वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी विहिर असूनही पिकांना पाणी देऊ शकत नव्हते. यासंदर्भात काही लाभार्थ्यांनी याबाबत कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सिध्दार्थ हत्तिअंबीरे यांच्याकडे हा विषय मांडला. त्यानंतर सोमवारी हत्तिअंबीरे, सुधीर कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची जिल्हा परिषदेत भेट घेतली. त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यानंतर टाकसाळे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अन्नछत्रे तातडीने जिल्हा परिषदेत आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा कृषी विकास अधिकारी ममदे यांची उपस्थिती होती.यावेळी झालेल्या चर्चेत या योजनेतील लाभार्थ्यांचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यावर निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेत विशेष शिबीर

ज्या लाभार्थ्यांना महावितरणची वीज जोडणी मिळाली नाही. त्या सर्व लाभार्थ्यासाठी १२ ते १४ जानेवारी असे तीन दिवस जिल्हा परिषदेत विशेष शिबीर घेऊन त्यांचे वीज जोडणीचे ऑनलाईन अर्ज दाखल करून देण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी जिल्हा परिषद व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष मोहीम राबवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज जोडणीचा प्रश्न यानिमित्ताने निकाली निघणार आहे.