शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : परतीच्या पावसाचा पिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:44 IST

शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात जून ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी हजारो रुपयांचा खर्च करून कापूस, सोयाबीन ही पिके जोपासली़ विशेष म्हणजे या संपूर्ण पावसाळ्यामध्ये पिकासाठी पोषक पाऊस झाल्याने पिकेही चांगली बहरली आहेत़ त्यामुळे मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती बदलून यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़ बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची कापणी करून शेतामध्ये साठवण केली आहे; परंतु, शनिवार व रविवारी झालेल्या पावसाने या पिकाला मोठा फटका बसला असून, हे सोयाबीन काळे पडत आहे़ त्यातच कापूस पिकाला सध्या बोंडे लागत आहेत़ मात्र दोन दिवस झालेल्या पावसाने कापसाच्या शेतामध्ये पाणी साचले आहे़यामुळे पिकांची बोंडे गळत असून, पीक सुकत आहे़ हजारो रुपये खर्च करून जोपासलेल्या कापूस व सोयाबीन पिकांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ हाता-तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय, अशी चिंता जिल्ह्यातील शेतकºयांना सतावू लागली आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी