शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

परभणी : टँकरने ओलांडला पाऊणशेचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:46 IST

जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना सतावते़ परभणी जिल्ह्यातही सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होते़ मात्र टंचाईची ही तीव्रता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते़ यावर्षी परभणी जिल्ह्याने हा अपवाद मोडित काढला असून, जिल्ह्यातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ गोदावरी, पूर्णा, वाण, बोरणा, करपरा, दूधना या नद्यांच्या पात्रात केवळ कोरडी वाळू शिल्लक आहे़ भकास पडलेले हे पात्र आणि प्रमुख प्रकल्प गावतलावांनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली असून, यंदा प्रथमच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करावेत लागत आहेत़शहरासह ग्रामीण भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, टँकर आल्यानंतर ग्रामस्थांचा टँकरभोवती गराडा पडतो़ एक-दोन बॅलर पाणी टँकरच्या सहाय्याने उपलब्ध होत असून, हे पाणी चार ते पाच दिवस पुरविले जात आहे़ अनेक भागांत विकतच्या पाण्यावर ग्रामस्थांना दिवस काढावे लागत आहेत़ त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक गंभीर झाली आहे़नळ पुरवठा योजनांची दुरुस्ती विहीर, बोअरचे अधिग्रहण यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाई शिथील करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत असले तरी दिवसेंदिवस टंचाई वाढत चालल्याने प्रशासनाचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गाव परिसरात पाणी शिल्लक नसल्याने शेतातून पाणी आणावे लागत आहे. वाढती पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.१०० टँकरचे नियोजनच्जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यात सुमारे सहा महिन्यांच्या पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला होता़च्या आराखड्यामध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १०० टँकर लागतील, असा अंदाज बांधला होता़ या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८५ टँकर सुरू करण्यात आले असून, लवकरच १०० टँकर सुरू करावे लागण्याची चिन्हे आहेत़च्जून महिन्यांपासून पावसाळ्याचे वेध लागतात. मात्र पाऊस वेळेवर झाला नाही तर संपूर्ण जून महिन्यांत टंचाई निवारणाची कामे जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मंजुरी दिलेली कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.पाथरी तालुका टँकरमुक्तच्ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले असले तरी पाथरी तालुक्यात मात्र आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़च्तालुक्याला यापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाले होते़ तसेच गोदावरी नदीपात्रावर बांधलेले दोन बंधारे या तालुक्यात असल्याने थोडेफार पाणी उपलब्ध होत आहे़च्या पाण्याच्या भरोस्यावर तालुक्यात आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़पालम तालुक्यात सर्वाधिक टँकरच्आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू केले़च्सद्यस्थितीला पालम तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत़ तालुक्यातील १६ गावे आणि सहा वाड्यांना या टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़च्गंगाखेड तालुक्यातील सहा गावे आणि तीन वाड्यांना १३ टँकर, जिंतूर तालुक्यातील १३ गावांना १३ टँकर, पूर्णा तालुक्यातील १२ गावांना १४ टँकर, सेलू तालुक्यातील ९ गावांना १०, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, परभणी तालुक्यातील ३ गावांना एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई