शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

परभणी : टँकरने ओलांडला पाऊणशेचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:46 IST

जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना सतावते़ परभणी जिल्ह्यातही सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होते़ मात्र टंचाईची ही तीव्रता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते़ यावर्षी परभणी जिल्ह्याने हा अपवाद मोडित काढला असून, जिल्ह्यातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ गोदावरी, पूर्णा, वाण, बोरणा, करपरा, दूधना या नद्यांच्या पात्रात केवळ कोरडी वाळू शिल्लक आहे़ भकास पडलेले हे पात्र आणि प्रमुख प्रकल्प गावतलावांनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली असून, यंदा प्रथमच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करावेत लागत आहेत़शहरासह ग्रामीण भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, टँकर आल्यानंतर ग्रामस्थांचा टँकरभोवती गराडा पडतो़ एक-दोन बॅलर पाणी टँकरच्या सहाय्याने उपलब्ध होत असून, हे पाणी चार ते पाच दिवस पुरविले जात आहे़ अनेक भागांत विकतच्या पाण्यावर ग्रामस्थांना दिवस काढावे लागत आहेत़ त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक गंभीर झाली आहे़नळ पुरवठा योजनांची दुरुस्ती विहीर, बोअरचे अधिग्रहण यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाई शिथील करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत असले तरी दिवसेंदिवस टंचाई वाढत चालल्याने प्रशासनाचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गाव परिसरात पाणी शिल्लक नसल्याने शेतातून पाणी आणावे लागत आहे. वाढती पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.१०० टँकरचे नियोजनच्जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यात सुमारे सहा महिन्यांच्या पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला होता़च्या आराखड्यामध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १०० टँकर लागतील, असा अंदाज बांधला होता़ या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८५ टँकर सुरू करण्यात आले असून, लवकरच १०० टँकर सुरू करावे लागण्याची चिन्हे आहेत़च्जून महिन्यांपासून पावसाळ्याचे वेध लागतात. मात्र पाऊस वेळेवर झाला नाही तर संपूर्ण जून महिन्यांत टंचाई निवारणाची कामे जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मंजुरी दिलेली कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.पाथरी तालुका टँकरमुक्तच्ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले असले तरी पाथरी तालुक्यात मात्र आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़च्तालुक्याला यापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाले होते़ तसेच गोदावरी नदीपात्रावर बांधलेले दोन बंधारे या तालुक्यात असल्याने थोडेफार पाणी उपलब्ध होत आहे़च्या पाण्याच्या भरोस्यावर तालुक्यात आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़पालम तालुक्यात सर्वाधिक टँकरच्आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू केले़च्सद्यस्थितीला पालम तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत़ तालुक्यातील १६ गावे आणि सहा वाड्यांना या टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़च्गंगाखेड तालुक्यातील सहा गावे आणि तीन वाड्यांना १३ टँकर, जिंतूर तालुक्यातील १३ गावांना १३ टँकर, पूर्णा तालुक्यातील १२ गावांना १४ टँकर, सेलू तालुक्यातील ९ गावांना १०, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, परभणी तालुक्यातील ३ गावांना एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई