शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :दोन हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:42 IST

तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उसनवारी व बँकांच्या दारात उभे राहून मिळालेल्या पैशातून खरीप हंगामातील पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे परभणी तालुक्यातील उखळद व परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीचा दुष्काळ बाजूला सारून शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून व आॅक्टोबर महिन्याच्या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन पीक चांगले बहरले. मात्र १९ व २० आॅक्टोबर रोजी उखळद व परिसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जवळपास २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व विमा कंपनीकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.ग्रा.पं.चे निवेदन४नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई द्यावी, अशी मागणी उखळद ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांकडे २२ आॅक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तौफिक बाशामियॉ पट्टेदार, विश्वनाथ तिखे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी