शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर सोयाबीन, कापसाची झाडे; सरसकट पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:57 IST

कळगावात १५ ऑगस्टला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शिवारातील पिके पाण्याखाली गेली.

- विनायक देसाईपूर्णा (जि. परभणी) : पूर्णा तालुक्यातील कळगावामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे काही ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याने संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांच्या टेबलावर खराब झालेली सोयाबीन, कापसाच्या झाडांचा ढीग घातला. यावेळी सरसकट पंचनामे करण्याची मागणी करत घोषणा देण्यात आल्या. यानंतर या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा जिल्हाकचेरीकडे वळविला, तेथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांनी व्यथा मांडली.

कळगावात १५ ऑगस्टला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शिवारातील पिके पाण्याखाली गेली. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पाण्यामुळे सोयाबीनच्या झाडाला पालाच शिल्लक राहिला, शेंगा गळून गेल्या. कापूस पीक आडवे झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, या पिकांच्या नुकसानीचे त्रिस्तरीय समितीकडून पाहणी केली जात आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या पिकांचेच पंचनामे केले जात आहेत. असा आरोप करत मंगळवारी तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय गाठत सरसकट पंचनाम्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या सोयाबीनची झाडे कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात टाकून घोषणाबाजी केली. यावेळी सुरेश सूर्यवंशी, संदीप वाव्हळे, शिवाजी सूर्यवंशी, अतुल देवकते, भानुदास सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, असिफ शेख, पुंडलिक सूर्यवंशी, पांडुरंग पवार, ओम प्रकाश देवकते, देवीदास वाघमारे, रंगनाथ कदम आदींसह कळगावातील शेतकरी उपस्थित होते.

जिल्हा कचेरीत पऱ्हाट्या घेऊन शेतकरीपूर्णा तहसील, तालुका कृषी कार्यालयास निवेदन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा जिल्हा कचेरीकडे वळत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, कापसाची झाडे घेऊन शेतकरी दाखल झाले. यावेळी जिल्हा कचेरीबाहेर शेतकऱ्यांनी घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र