शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

बियाणांसाठी २३ हजार अर्जांतून ६ हजार शेतकऱ्यांचेच नशीब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:13 AM

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. यासाठी या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक करण्यात ...

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. यासाठी या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ हजार ८७८ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणांसाठी अर्ज केले होते. जिल्ह्याला फक्त ६ हजार शेकऱ्यांनाच अनुदानित बियाणे देण्याचे उद्दिष्ट असल्याने कृषी विभागाच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील लाभार्थी निवडण्यात आले आहेत. असे असले तरी जवळपास १६ हजार शेतकऱ्यांना हे बियाणे मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे.

अर्ज केलेल्या सर्वांना लाभ मिळावा

गेल्या ३ वर्षभरापासून शेतकऱ्यांवर अनेक वेळा संकटे आली आहेत. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे फसवणूक झाली आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे दिले पाहिजे.

- दासराव काळे, शेतकरी

तुटपुंजे अनुदान मिळत असल्याने निराशा

शासनाकडून बियाणांसाठी केवळ ३४० रुपयांचे तुटपुंजे अनुदान देण्यात येत आहे. ही निराशाजनक बाब आहे. त्यामुळे शासनाने एकतर १०० टक्के अनुदानित बियाणे द्यावे किंवा योजनाच बंद करावी.

- सतीश जांभळे, शेतकरी

शासनाची योजना केवळ दिखाव्यापुरतीच

शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानित बियाणे दिले पाहिजे. कारण त्यांनाच मदतीची गरज आहे; परंतु या गटाचा विचार न करताच ही योजना राबविण्यात येत आहे. यामुळे हा गट दुर्लक्षित राहिला आहे.

- अनिल साबळे, शेतकरी