शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

लसीकरणासाठी महिला कर्मचारी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:16 AM

परभणी : जिल्ह्यात ९०७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली असून, त्यात ६६१ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, त्या ...

परभणी : जिल्ह्यात ९०७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली असून, त्यात ६६१ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, त्या तुलनेत केवळ २४६ पुरुष कर्मचाऱ्यांनीच लस घेतली आहे. त्यामुळे कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी ही लस घेण्यासाठी पुरुष कर्मचारी फारसे पुढे येत नसल्याची बाब आतापर्यंत झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यांवरून स्पष्ट होत आहे.

कोरोनाच्या महाभयंकर आजारामुळे जिल्ह्यात मागील वर्षातील सात- आठ महिने नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली घालवले. या आजारावर लवकर लस उपलब्ध व्हावी, अशी त्यावेळी प्रतीक्षा केली जात असे. जिल्ह्यात १५ जानेवारी रोजीच ही लस उपलब्ध झाली. शासनाच्या निर्देशानुसार सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील चार केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे दररोज ४०० कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार १६ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ४०० पैकी ३९४ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना थंडी वाजणे, ताप येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १९ जानेवारी रोजी ४०० पैकी २२९ आणि २० जानेवारी रोजी २८४ कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतली आहे.

विशेष म्हणजे, लसीकरण करून घेण्यासाठी पुरुष कर्मचारीच मागे राहत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २० जानेवारी रोजी पार पडलेल्या लसीकरणात जिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर २४ पुरुष आणि ७ महिलांनी लसीकरण करून घेतले. सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात १११ महिला कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. मात्र, एकाही पुरुष कर्मचाऱ्याने लस घेतली नाही. जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७३ महिलांनी लसीकरण करून घेतले तर केवळ एका पुरुष कर्मचाऱ्याने या ठिकाणी लस घेतली. महापालिकेच्या जायकवाडी केंद्रावरही ६८ महिलांना लसीकरण झाले. तर पुरुषांची संख्या केवळ १५ होती. त्यामुळे लसीकरणासाठी पुरुष कर्मचारी पुढे येत नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने होत आहे.

संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे

जिल्ह्यात पहिल्या दिवशी लसीकरण केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना थंडी वाजून येणे, ताप येणे अशी लक्षणे आढळली. त्यामुळे लस घ्यावी की नाही, अशी द्विधा मन:स्थिती काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. मात्र, कोणतीही लस घेतल्यानंतर थंडी वाजून येणे, ताप येणे अशी लक्षणे जाणवतातच. शासनाने उपलब्ध करून दिलेली लस पूर्णत: सुरक्षित आहे. जाणवणारी लक्षणे साइड इफेक्ट नाहीत. त्यामुळे न घाबरता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.