शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:18 IST

या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या तिजोरीत महसुलाची भर६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी : जिल्ह्यासाठी वरदान लाभलेल्या येलदरी येथील प्रकल्पातून ७ महिन्यांमध्ये ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती झाली असून, याद्वारे राज्याच्या तिजोरीमध्ये १४ कोटी रुपयांच्या महसूलाची भर या सिंचन प्रकल्पाने घातली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाने परभणीसह हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमधील अनेक शहरे आणि गावांची तहान भागविली आहे. शिवाय लाखो हेक्टर क्षेत्र सिचंनाखाली आले आहे. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे येथील वीज निर्मित प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आला. एप्रिल  महिन्यापासूनच प्रकल्पाची वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी हा प्रकल्प बंद होता; परंतु, १२ ऑगस्ट रोजी येलदरी धरण १००टक्के भरल्याने अतिरिक्त होणारे पाणी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडण्यात आले. लॉकडाऊन आणि कमी मनुष्यबळ असतानाही या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीज निर्मितीचे केलेले काम कौतुकास्पद ठरत आहे. १ एप्रिल ते २२ ऑक्टोबर या ७ महिन्यांच्या काळात ४६.१४ दशलक्ष युनिट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करण्यात आली असून, राज्याच्या तिजोरीत १४ कोटी रुपयांची भर घातली आहे.

महानिर्मितीचे मुख्य अभियंता ए.एस. कुलकर्णी, नाशिक येथील अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत, कार्यकारी अभियंता बी.एम. डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.के. रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अखंडीतपणे हे केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची पदे रिक्तयेलदरी येथील जल विद्युत प्रकल्पाने राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा केला असला तरी या प्रकल्पाला कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची एकूण ५६ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २५ कर्मचाऱ्यांवर हा प्रकल्प चालविला जात आहे. विशेष म्हणजे वीज निर्मिती केंद्राची उभारणी होवून ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी बसविलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. यंत्रणा जुनी झाल्यानंतर तिची क्रय शक्ती कमी होते. मात्र येथील वीज निर्मिती केंद्राने स्थापित क्षमतेपेक्षा अधिक वीज निर्मिती करून वेगळेपण सिद्ध केले आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखालीयेलदरी प्रकल्पाला मराठवाड्यात अनन्य साधारण महत्व आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीचे सिंचन होणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील मोठ्या शहरासह २५० हून अधिक गावांना वर्षभर पाणी पुरवठा येथून होतो. 

टॅग्स :parabhaniपरभणीelectricityवीज