शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रा.पं. खात्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST

१ सप्टेंबर २०२० ला तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला ...

१ सप्टेंबर २०२० ला तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये एवढ्याच रकमेचा दुसरा हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. या निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीने बंदिस्त व इतर कामांची आखणी करण्यात आली. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी उत्साही होते;मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने डिजिटल सॉफ्टवेअरच्या अंतर्गतच या विकासकामांचे देयक काढण्यात येतील असे आदेश बजावले. १५ व्या वित्त आयोगांतर्गत देयके अदा करण्याचे काम पंचायत समिती ऐवजी पीएफएमएस सिस्टीमला देण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसल्याचे चित्र आहे. पूर्वी ग्रामपंचायतीला वर्ग झालेला निधी खर्च करण्यासाठी सोपी पद्धत अवलंबिली जात असे मात्र राज्य शासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याने निधी खर्च करण्यासाठी अडचणी येत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम असून अडचण नसून खोळंबा असल्याचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सांगत आहेत. यामुळेच देयक अदा करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे मागील ७ महिन्यांपासून तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतीच्या खात्यावर १५ व्या वित्त आयोगाचा निधी पडून असल्याचे चित्र आहे.परिणामी ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प आहेत.

देयकासाठी बघावी लागते वाट

तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीने डीएसी प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे १५ ते १७ ग्रामपंचायतीला विकास कामावर निधी खर्च करण्यासाठी वर्कऑर्डर मिळाली आहे. यामध्ये भोसा, गोगलगाव,पारडी टाकळी, शेवडी जहागीर, बोन्दरवाडी, नागरजवळा, देवलगाव, हटकरवाडी, ईरळद, पाळोदी, आंबेगाव रामेटाकळी, मानोली या ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतीचा समावेश आहे; मात्र विकास कामावर निधी खर्च केल्यानंतर देयकासाठी पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत निकष

शासनाचे ५० टक्के व अबंधित ५० टक्के बंधीत असे खर्च करावयाचे निकष आहेत. मात्र चालू वर्षात केंद्र सरकारने हे निकष बदलून ६० टक्के अबंधित व ४० टक्के बंधित असे नवीन निर्देश दिल्याने विकास निधीतून काम करु पाहणारे सरपंच चांगलेच गोंधळून गेले आहेत. १४ व्या वित्त आयोगात सर्व निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करून विकासकामे झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर देयके अदा करण्यात येत होते.