शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षातच कालव्यासह वितरिकेची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या माध्यमातून शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी या प्रकल्पाला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. त्यापैकी ४८ ...

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या माध्यमातून शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी या प्रकल्पाला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. त्यापैकी ४८ किमी लांबीचा उजवा कालवा परभणी तालुक्यातून जातो. या तालुक्यातील कार्ला, कुंभारी एकरुखा, डिग्रस, वाडी, नांदापूर, झरी, सावंगी आदी भागात कालव्याची व वितरिकेची कामे करण्यात आली आहेत. काम सुरू होताच येथील लाभार्थ्यांनी कामाविषयी तक्रारी पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. परंतु, या विभागाने तात्पुरती डागडुजी करून ही कामे उरकून घेतली आहेत. कालव्याचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. सद्यस्थितीत निम्न दुधना प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्याची व वितरिकेची अर्धवट कामे व निकृष्ट दर्जाची असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती होऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे लाभाऐवजी शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसानच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे दोनच वर्षात अनेक ठिकाणी उजव्या कालव्याच्या वितरिकांना ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी कालवा खचला आहे. फरशी उखडली असून, कालव्यात वाढलेल्या झाडीमुळे दुरवस्थेत आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे प्रकल्पातून सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत तर सोडाच परंतु, कालवाअंतर्गत लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारांकडून दुरवस्था झालेल्या कालव्याची दुसऱ्यांदा कामे करून घ्यावीत, अशी मागणी चार गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.

५०० कोटींचा खर्च पाण्यात का?

निम्न दुधना प्रकल्पाच्या ४८ किमीच्या उजव्या कालव्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य कालव्यासह वितरिकांनाही काही ठिकाणी तडे गेले आहेत. असे असताना या पाटबंधारे विभागाकडून संबंधित गुत्तेदारांना पाठीशी घातले जात आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे, तर दुसरीकडे निकृष्ट दर्जाची कामे करण्यात येत असतानाही अभियंत्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागातील अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.