नागरिकांची गैरसोय
परभणी : शहरातील भीमनगर भागात वारंवार रेल्वे गेट बंद होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय कायम आहे.
पोलीस चौकी बंद
परभणी : शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेली पोलीस चौकी मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणारी चौकी सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
जड वाहनांचा शिरकाव
परभणी : बाजारपेठ भागात जड वाहनांना प्रवेशबंदी असताना सर्रास या रस्त्यावरुन चारचाकी वाहनांसह जड वाहने नेली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
हंगाम अंतिम टप्प्यात
परभणी : साखर कारखान्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, शिल्लक असलेला ऊस लवकर कारखान्याने न्यावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. यावर्षी जिल्ह्यात ऊस लागवड वाढली आहे.