शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ११११ कोटींची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची ...

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असून, ८ हजार २२३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने ते या योजनेपासून वंचित आहेत.

राज्यात राज्य शासनाने २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या ७ याद्या आतापर्यंत प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ जानेवारी अखेरपर्यंत १ लाख ८२ हजार ७१८ लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण केले. त्यापैकी १ लाख ७८ हजार १५५ लाभार्थ्यांच्या खात्यात ११११.२१ कोटी रुपये शासनाच्यावतीने जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ४ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणिकरण केले नसल्याने ८ हजार २२३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना यासाठी प्रशासनाच्यावतीने संधी देण्यात येत आहे. त्यांनी येत्या तीन दिवसांत जवळच्या शासकीय केंद्र, सीएनसी सेंटर किंवा बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ देणे सोपे होईल. तसेच कर्जमुक्त झालेले शेतकरी २०२०-२१ या हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. आधार प्रमाणिकरण न करून घेतल्यास योजनेचा लाभ, तर मिळणारच नाही, उलट कर्जाची रक्कम व्याजासह बँकेकडून वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे यादीत नाव असलेल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

सर्वाधिक कर्जमुक्ती एसबीआयकडून

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० बँकांमधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५७७ कोटी १२ लाख ५९ हजार ७१ रुपयांची कर्जमुक्ती भारतीय स्टेट बँकेतील ८१ हजार ४०५ शेतकऱ्यांची झाली आहे. या बँकेने एकूण ९५ हजार ८०४ खाते पोर्टलवर अपलोड केले होते. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३४ हजार ४ लाभधारक शेतकऱ्यांची २६३ कोटी ७७ लाख १७ हजार २५७ रुपयांची कर्जमुक्ती केली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ३६ हजार ८९९ शेतकऱ्यांना ९० कोटी ७६ लाख ८७ हजार ७०१ रुपयांची कर्जमुक्ती दिली आहे.