शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील ऋतुराज देशमुख वयाच्या २१ व्या वर्षी त्यानं स्वत:सह गावात पॅनल निवडून आणलं.तो विचारतो, हातावर हात ठेवून किती दिवस बसायचं?

-समीर इनामदार

तरुण पोरांनी नुसतंच किती दिवस सतरंज्या उचलायच्या? नुसतं फेसबुक, व्हॉट्‌स ॲपवर लिहून उपयोग होत नसतो, थेट मैदानात उतरून सत्ता मिळवायला हवी.. विकास आपल्याला पाहिजे तर आपण कष्ट करू, आपण पुढं होऊन काम करू..

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाचा ऋतुराज रवींद्र देशमुख सांगत असतो. वय २१ वर्षे.

त्याच्या गावात गेल्यावर लक्षात येतं की तो जे काही गावच्या विकासाचं स्वप्न, त्याच्या दोस्तांना सोबत घेऊन पाहतोय ते बोलण्याइतकं सोपं काम नाही. त्याच्या गावाला ना रस्ता आहे ना प्यायला पाणी. नदी गावाजवळून गेली असली तरी आयाबाया डोक्यावर हंडा घेऊन पाण्याला जातात.

ऋतुराज म्हणतो, या साऱ्याची मला चीड आली. इलेक्शन लागलं तसं ठरवलं की, आपण लढायचं. किती दिवस नुसतं हातावर हात ठेवून बसून राहायाचं? वारंवार सांगूनही काही होत नसेल तर ही सिस्टिम बदलली पाहिजे. त्यासाठी आपण निवडणूक लढविली पाहिजे.

मग त्यानं त्यानं नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनेते बाबुराव पाटील पॅनल उभं केलं. सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य निवडून आले आहेत. आता सत्ता त्यांचीच. या तरुण मुलानं आपला प्रचार प्रत्यक्ष केला तसा सोशल मीडियाचा वापर करूनही केला. वचननामा तयार केला तो गावकऱ्यांना दिला. गावच्या लोकांनीही या तरुण पोरांवर विश्वास टाकत, त्यांना निवडून दिलं.

ऋतुराजला तर म्हटलं तू निवडून तर आलास, तुझं पॅनलही जिंकलं, आता पुढं काय?

तो सांगतो, ‘आता गाव बदलायचं. एकदम पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडीसारखं. गावात दुधाचा मुख्य व्यवसाय. शेतीसोबत लोक दुधाचा धंदा करतात. गावात ४५०० लीटर दूध तयार होतं. हे सारं गृहित धरून गावाला मुख्य प्रवाहात आणायचंय. गावाला चांगले रस्ते असले पाहिजेत, वृद्ध, महिलांना डोक्यावर पाणी आणायाला नको यासाठी पाण्याची टाकी बांधायची, गावात कचरा व्यवस्थापन झालं पाहिजे, पाण्याचा ऑडिट झालं पाहिजे.’

बी.एस्सी. केल्यानंतर पुण्यात विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या ऋतुराजला आता सरपंच होण्याची इच्छा आहे. २७ जानेवारीला सरपंचपदाचं आरक्षण जाहीर होईल, तेव्हा कळेल तो सरपंच होतो किंवा नाही.

मात्र निवडून येण्याइतपत विश्वास त्यानं कमावला. तो सांगतोच,

एखादी गोष्ट आवडली नाही तर ती बदलण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. दुसरं कुणी येईल आणि आपलं भवितव्य बदलेल असं असणार नाही. त्यासाठी स्वत:च व्यवस्थेत उतरु, व्यवस्था बदलू, काम करू!

 

( समीर लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहे.)

joyasam@gmail.com