शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

Whats up?

By admin | Updated: March 12, 2015 15:04 IST

परीक्षेच्या काळात मन थार्‍यावर राहत नसेल तर इतरांना नाही; स्वत:लाच विचारा हा प्रश्न!

तुम्ही अभ्यास करताय; फोन सायलेण्टवर टाकलाय!
मोबाइल डाटा तर बंदच करून ठेवलाय.
परीक्षा अगदी जवळ आली आहे; म्हणून तुम्ही दे दणादण रट्टा मारताहात.
पण मन मात्र इतकं उतावीळ, जीव कासाविस असं वाटतं; एकदा तरी मोबाइल डाटा ऑन करावा.
पाहावं तरी ग्रुपवर काय चाललंय.
कोण काय म्हणतंय.
एकदाच पाहावं.
दोन मिनिटं.
फक्त दोन मिनिटं..
खूप खूप रोखता तुम्ही स्वत:ला.
पण मन ऐकत नाही.
जिवाची तगमग होते.
मग तुम्ही मोबाइल डाटा ऑन करता, व्हॉट्सअँपवर जाता..
आणि मग.?
तिथंच रेंगाळता. गप्पा छाटत बसता.
ग्रुपवर न राहवून बोलता.
इतकंच कशाला, तिथं सामसूम असली, एकही नवा मॅसेज दिसला नाही तरी तुम्ही अस्वस्थ होता.
अभ्यासातलं तुमचं चित्तच उडतं.
मन लागत नाही. आपण काय वाचतोय हेच कळत नाही.
मग खूप चिडचिड होते.
राग येतो की, आपण किती या सार्‍याच्या आहारी गेलो आहोत. आपल्या करिअरचा प्रश्न आहे, अभ्यास अजून काहीच नाही, मार्क नाही पडले भरपूर तर वाट लागेल हे आपल्याला माहिती आहे.
पण तरी आपल्याला व्हॉट्सअँप पाहिल्याशिवाय चैन पडत नाही!
हे असं माकड का झालंय आपलं?
सतत ‘व्हॉट्सअँप म्हणणारं माकड’?
त्यात आईबाबांची कटकट. ते म्हणतात, बाकी सगळं बरं पण हा हातातला मोबाइल आधी फेकून द्यायला पाहिजे. भिकेचे डोहाळे. उद्या कुठं अँडमिशन मिळणार नाही तेव्हा बसा रडत!
पण या अशा परस्थितीत करायचं काय?
टाळायचं कसं व्हॉट्सअँप?
फोकस कसं करायचं?
मुख्य म्हणजे करायचं काय?
नेमकं होतंय काय हे मुलांचं?
***
तुमच्या मनातले हेच सारे प्रश्न आम्ही सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टींना विचारले.
आणि त्यांनी या विषयाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी दिली आहे.
ते काय म्हणतात; वाचा त्यांच्याच शब्दात.
 
- ऑक्सिजन टीम