शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

१२ मतदारांचे आभार मानणाऱ्या विकासची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 07:55 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत गावात फक्त १२ मते पडली, पण त्या १२ जणांनी तरी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांचे जाहीर आभार मानायची जिंदादिली त्याने दाखविली.

- संदीप शिंदे

त्याने लावलेले पोस्टर राज्यात सर्वत्र व्हायरल झाले. १२ मतदारांचे जाहीर आभार, असा डिजिटल फलक त्याने लावला होता. तो फोटो तुफान व्हायरल झाला, समाजमाध्यमात अनेकांनी लिहिले की, पराभव स्वीकारावा तर तो असा. ग्रामपंचायत निवडणुकीत गावात फक्त १२ मते पडली, पण त्या १२ जणांनी तरी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांचे जाहीर आभार मानायची जिंदादिली त्याने दाखविली. अपयशही असे दिलदारीने मिरविले.

विकास शिंदे त्याचे नाव. गावाचे नाव, डोंगरकोनाळी, ता़ जळकोट जि. लातूर. त्याचे ते पोस्टर व्हायरल झाल्यावर त्याला विचारले की, लोक जिंकले की पोस्टर लावतात, तू हरलास तरी लावले, ते लावताना काय विचार केला होता?

विकास सांगतो, जीवनात यश-अपयश चालूच असते, त्यात मी पहिल्यांदाच निवडणूक लढविली होती. प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलो, मी हिंमत तर केली या गोष्टीनेच मला कॉन्फिडन्स दिला. निवडणूक कशी लढवतात हे मी शिकलो, हारलो हे मान्य आहे. पण जे शिकलो ते तर महत्त्वाचे आहे, ते आता कुठे जाणार. मला त्याचा फायदाच होईल. मी याच गावात वाढलो-शिकलो. लहानपणापासूनच गावातील रस्त्यांची अवस्था, आरोग्याचे प्रश्न, पाण्याची टंचाई, शिक्षणाच्या सोयी हे सारे बघतोय. वाटले, आता इलेक्शन आहे तर आपण स्वत: पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी स्वत:चे पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला़ मात्र, अपेक्षित साथ मिळाली नाही, मग मी एकटाच उभा राहिलोे. शिटी हे मला निवडणूक चिन्ह मिळाले. माझ्या विजयाची शिटी वाजली नाही, पण विकासाची कधी ना कधी वाजेल, पुन्हा प्रयत्न आणि विकासासाठी संघर्ष करू, असे मी ठरवले आहे. आता नाही मिळाले यश तर नाही.’

विकास त्याचा आशावाद सांगतो.

डोंगरकोनाळी गावात एकूण मतदारसंख्या होती २४६. त्यापैकी १९२ मतदारांनी मतदान केले, त्यातील १२ मते विकासला मिळाली. विकास म्हणतो, किमान १२ लोकांना तर माझे विचार पटले, निदान त्यांनी तरी माझ्यावर भरवसा ठेवला, मग त्यांचे आभार नको का मानायला. या निवडणुकीने मला माणसे ओळखण्याची संधी दिली़ लोकांसमोर जायचे कसे, आपले विचार कसे मांडायचे हे शिकवले. मग निराश कशाला होऊ, आता हरलो असेल तर भविष्यात जिंकेनही!

-व्हायरल झालेल्या फोटोमागची कहाणी विकास असा सांगत असतो. अपयश न कवटाळता तो निवडणुकीनं दिलेला धडा असा उमेदीने शिकतोय!

( संदीप लोकमतच्या लातूर कार्यालयात वार्ताहर आहे.)