शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचं तोंड गावात दिसलं पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

कोल्हापूर जिल्ह्यातलं उंड्री नावाचं लहानसं गाव. ति‌थल्या तरुण मुलामुलींनी एकत्र येत पॅनल बनवलं. ते लढले आणि..

-इंदुमती गणेश

आम्ही लहान असल्यापासून बघतोय ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे तीच माणसं, त्यांचीच सत्ता. पण गावात विकासाचा पत्ता नाही. आदर्श गाव म्हणून बाकीची गावं गाजतात, त्यात आमचं गाव कुठंबी न्हाई. एकाच जागी थांबलंय जखडून ठेवल्यागत. बदल हवा होता, मग आम्ही ठरवलं ग्रामपंचायतीला लढायचं. आम्ही पॅनल उभारतोय म्हटल्यावर एवढी वर्षे एकमेकांना पाण्यात बघणारे सत्ताधारी-विरोधक एकत्र आले. आम्हाला प्रभागात उमेदवारच मिळू देईना. आमच्या नावाच्या पॅम्पलेटवर नारळ, सुया टोचलेले लिंबू, हळद-कुंकू, ब्लाऊजपीस ठेवून भानामतीची भीती दाखवायलाही काही मागे हटले नाहीत. माघारीसाठी दबाव, फोडाफोडीचं राजकारणही झालं. पण आम्ही लढलो, आता निवडून आलो. इच्छा एकच, गावचा विकास झाला पाहिजे..

- कोल्हापूरपासून ३७ किलोमीटरवर पन्हाळा तालुक्यातील उंड्री नावाचं लहानसं गाव आहे. या आडवाटेवरच्या गावात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत निवडून आलेले तरुण सदस्य आपला अनुभव सांगत होते. या गावातल्या तरुणांनी ठरवलं, आपणच पुढाकार घेऊन इलेक्शन लढवू. मग त्यांनी एकत्र येत श्री निनाई जनयुवाशक्ती पॅनल नावाचं तयार केलं. नऊ जागा लढवल्या. सगळेच पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे. त्यापैकी पाच जण निवडून आले. उज्ज्वला कांबळे, सविता यादव, रंजना यादव, शहाजी यादव व शरद मोरे यांनी विजय मिळवला. गावकऱ्यांनी या नव्या तरुण उमेदवारांवर भरवसा ठेवला.

त्यांच्याशी बोलायला म्हणून त्यांच्या गावी जावं तर धड रस्ता नाही. मुख्य म्हणून जो रस्ता त्यात खड्डेच जास्त. गावात दर्शनी जी ग्रामपंचायतीची इमारत दिसते तीही पडकीच. बाजूला तुंबलेली गटारं, अस्वच्छता. गावाला जोडून खोतवाडी आणि चव्हाणवाडी असे दोन वाडे आहेत, इथलं एकूण मतदान तेराशेच्या आसपास. गावात सेंट्रिंगचा मुख्य व्यवसाय. सोबत एमआर, शेती आणि दुग्ध व्यवसाय. शाळा सातवीपर्यंत. पुढच्या शिक्षणासाठी दोन-तीन किलोमीटरवरच्या दुसऱ्या गावात जावं लागतं.

निवडणूक लढवणाऱ्या-जिंकणाऱ्या या तरुण दोस्तांशी बोलणं झालं. तर ते सांगतात, ‘हे गावंच चित्र पाहताय तुम्ही. आम्ही ठरवलं, आपल्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी करू. गावचा विकास झाला पाहिजे, हे चित्र बदललं पाहिजे. आम्ही निवडणूक लढवायची म्हटलं तर आधी तर चेष्टाच झाली. कशाला नाही ते उद्योग करताय, असा सल्लाही मिळाला. अनुभव तर आम्हालाही नव्हता, आजही नाही. पण घरोघर जाऊन लोकांशी बोललो, त्यांनी आमच्यावर भरवसा ठेवला. आता त्या भरवशाला जागून काम करायचं आहे.’

निवडून आलेल्यात तीन तरुणी त्यापैकी दोघी विवाहित आणि दोन तरुण. सगळे सर्वसामान्य कुटुंबातले, कष्टकरी. कोणलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. हाती पैसाही नव्हताच. मात्र त्यांनी हिंमत करून निवडणूक तर लढवलीच. गप्पांनंतर गावात एक फेरफटकाही मारला. परत निघालो तेव्हा सगळे म्हणाले, ताई पुढच्यावेळी तुम्ही याल तेव्हा तुम्हाला आमचं गाव बदललेलं दिसेल..

या तरुण हातांच्या कष्टांना यश लाभो, या शुभेच्छा..!

( इंदुमती लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

indu.lokmat@gmail.com