शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बॅक ऑन ट्रॅक

By admin | Updated: October 9, 2014 18:47 IST

सेटलबिटल झालो, लग्नबिग्नं झाली, मग पुढे? त्याचंही उत्तर सापडलं आणि आम्ही मित्र कॉलेजातल्याच उत्साहानं नव्यानं कामाला भिडलोय.

‘संवेदना ’ ग्रुप स्थापन करुन जेव्हा मित्र कामाला लागले.
 
 
 
कॉलेज संपलं. जो तो आपापल्या आयुष्यात बर्‍यापैकी सेटल झाला. नोकरीबिकरी, लग्नबिग्नं झाली. सगळे मित्र आता फक्त बारसे, वाढदिवसांना भेटू लागले. एनएसएसमध्ये शिकलेली सामाजिक कामांची जाणीव कॉलेजातच राहून गेली. कुठंतरी.  
आमचा मित्र समीरच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रंगलेल्या मैफलीनं मात्र अचानक टर्न घेतला आणि आम्ही थेट कॉलेज कट्टय़ावर पोहोचलो. एनएसएसच्या माध्यमातून मिळविलेला सामाजिक बांधिलकीचा ‘टच’ रिन्यू झाला. प्रत्येकाला  वाटू लागलं, कॉलेज काळात खूप उपक्रम यशस्वी केलेत. तेव्हा खिशात पैसा नव्हता, अनुभव नव्हता, कुणी मदत करण्यास तयार नव्हतं, पण केवळ इच्छेच्या बळावर बरेच उद्योग केले. कॉलेज सुटल्यापासून ते मागे पडलं.  मात्र बोलता बोलता आम्ही जुन्या ट्रॅकवर आलो हे महत्त्वाचं. संवेदना क्रिएटिव्ह क्लब असं आमच्या ग्रुपचं नामकरण झालं.
सुरूवातीला मनपाच्या ‘ग्रीन अकोला; क्लिन अकोला’ या हाकेला प्रतिसाद देत शहरातल्या मुबलक पाणी असलेल्या भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले. दोन वर्षात वाढलेली झाडं आवश्यक सुरक्षा कवच देऊन परिसरातील नागरिकांना दत्तक दिली. ठरावीक कालावधीच्या अंतराने २५-२५ झाडं लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी शेजार्‍यांवर सोपवत, स्वत:ही झाडं जगवण्याच्या योजना करत कामाला लागलो. 
आता आम्ही एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेलं ‘जनुना’ हे गाव दत्तक घेतलं. या गावात मूलभूत सेवा पुरविण्याची योजना आखल. सध्या २५0हून अधिक सक्रिय स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी आहेत.
गावाचा परिचय व्हावा, गावकर्‍यांशी ओळख व्हावी म्हणून संवेदनानं कपडे वाटपाचा पहिला कार्यक्रम ठेवला. या उपक्रमात आपल्याकडील व आपल्या मित्रांकडे वापरात नसलेले कपडे एकत्र केले. ते स्वच्छ धुवून, इस्त्री करून घेतले आणि जनुन्यात त्याचे वाटप केले. कपडे देताना सांगितलं की, आम्ही काही फार श्रीमंत नाही, जे जमेल ते देतोय. आणि देतोय म्हणजे उपकार नाही, फक्त आमच्या भावना समजून घ्या, आम्ही फक्त मदत करतोय. 
अशा कामांचा फार उपयोग नाही हे आम्हालाही पटलं; पण निदान ओळख तरी झाली गावकर्‍यांशी. पण पुढच्या आठच दिवसात कानावर बातमी आली आमच्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाल्याची. कपडे वाटपाची बातमी जेव्हा वृत्तपत्रामधून छापून आली तेव्हा हिवरखेड नावाच्या गावच्या शाळेनं एक उपक्रम राबविला. शिक्षकांनी पेपरात छापून आलेली बातमी विद्यार्थ्यांना दाखवून विचारलं, आपण असं काय करू शकतो? तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या अतिरिक्त शालेय वस्तू देण्याची तयारी दर्शविली. या उपक्रमात विद्यार्थी इतके सरसावले की, पेनाच्या दोन पैकी एकेक रिफिलीसुद्धा त्यांनी डोनेट बॉक्समध्ये टाकल्या. अर्धवट लिहून सोडलेल्या नोटबुक, स्केल, पेन्सिली, पाठय़पुस्तके, जुनी दफ्तरं अशा वस्तूंनी अनेक गरजू विद्यार्थ्यांची  ‘निकड’  भागविली.
दिवाळीत आता आम्ही एक तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केलं आहे. शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांची पहिली गरज म्हणून आरोग्य तपासणी,  औषधोपचार शिबिर तसेच आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
नोकरी-व्यवसायातून आलेल्या शहाणपणाचा उपयोग करून आम्ही कॉलेजच्या काळातल्याच उत्साहानं कामाला लागलोय. अजून काय पाहिजे?
 
- नंदकिशोर चिपडे आपातापा, ता. जि. अकोला.