शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:05 AM

किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला.

नवी दिल्ली : किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. आता पुढील वर्षात अत्यंत व्यस्त वेळापत्रक असून, यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी श्रीकांतला चुका करण्यावर नियंत्रण राखावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी दिली. श्रीकांतला रविवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा श्रीकांत भारताचा पहिला पुरुष शटलर ठरला होता.

गोपीचंद यांनी सांगितले की, ‘प्रत्येक सामन्यागणिक श्रीकांतच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, परंतु ली जी जिया आणि केंटो मोमोटा यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध केलेल्या शानदार खेळाने त्याचा आत्मविश्वास उंचावला. 

विशेष म्हणजे त्याला योग्य वेळेला लय मिळाली. आता पुढील वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा यासारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला आपल्या चुकांवर नियंत्रण राखावे लागेल.’

गोपीचंद पुढे म्हणाले की, ‘सलग स्पर्धा खेळल्याने अनेक खेळाडूंसाठी दुखापतीतून सावरणे कठीण होते. श्रीकांतसोबतही असेच झाले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी त्याने पुनरागमनासाठी घाई केली. स्पेनमध्ये त्याला तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात खेळताना पाहून चांगले वाटले. सुदीरमन कप स्पर्धेपासून तो सातत्याने खेळत असून हे चांगले संकेत आहेत.’ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतसह एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनीही छाप पाडली. प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, तर लक्ष्य उपांत्य फेरीत पराभूत झाला. श्रीकांतने लक्ष्यलाच नमवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. याबाबत गोपीचंद म्हणाले की, ‘या खेळाडूंना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये पोहोचल्याचे पाहून आनंद झाला. लक्ष्य आणि प्रणॉय यांनीही शानदार खेळ केला. आगामी महत्त्वाच्या सत्रासाठी ही चांगली चिन्हे आहेत.’ 

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतPullela Gopichandपुलेला गोपीचंद